Tuesday, May 28, 2024

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 59 प्रकरणांची नोंद - उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर:-नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव  शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवरकचरा  फेकणाऱ्यांवरथुंकणाऱ्यांवर५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहेमंगळवारी (ता28रोजी उपद्रव शोध पथकाने 59 प्रकरणांची नोंद करून 43 हजार 100 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावरफुटपाथवर कचरा टाकणारेथुंकणारेघाण करणारेलघुशंका करणारेप्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहेसार्वजनिक ठिकाणी, रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी थुंकणे या अंतर्गत प्रकरणाची नोंद करुन  200 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. हाथगाडया स्टॉल्स पानठेले फेरीवालेछोटे भाजी  विक्रेते  यांनी  लगतच्या  परिसरात  अस्वच्छता (रु४००/- दंडया अंतर्गत  14 प्रकरणांची नोंद करून  
5 हजार 600 रुपयांचा दंडवसुल करण्यात  आला व्यक्तीने  रस्ता, फुटपाथमोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 06 प्रकरणांची नोंद करून 600 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.  दुकानदाराने रस्ता फुटपाथमोकळी जागा  अशा ठिकाणी  कचरा टाकणे या अंतर्गत 4  प्रकरणांची नोंद  करून हजार 600  रुपयांचा  दंड वसुल करण्यात आला. मॉलउपहारगृह,लॉजिंग,  बोर्डिंगचे होर्डिंग, सिनेमाहॉलमंगल कार्यालयेकॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ताफुटपाथमोकळी जागाअशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 03 प्रकरणांची नोंद करून 6 हजार रुप

यांचादंड  वसुल करण्यात आलावाहतुकीचा रस्ता मंडपकमानस्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 03 प्रकरणांची नोंद करून 2 हजार 500 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. वैद्यकीय व्यवसायिकांनी बॉयोमेडीकल वेस्ट सर्वसाधारण कचऱ्यात टाकणे प्रकरणाची नोंद करुन 10 हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. वर्कशॉप, गॅरजेस व इतर दुरुस्तीचे व्यवसायीकांने रस्ता, फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 04 प्रकरणांची नोंद करुन हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे/साठवणे, प्रथम 48 तासात हटविण्याची नोटीस देऊन न हटविल्यास या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करुन 3 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. उपरोक्त यादीत  आढळणारे इतर उपद्रव  (व्यक्तीअसल्यास  13 प्रकरणांची नोंद करून 2 हजार 600 रुपये  दंड वसूल करण्यात  आलेला आहेउपरोक्त यादीत  आढळणारे इतर उपद्रव (संस्था) असल्यास 7 प्रकरणांची नोंद करून 7 हजार रुपये दंड वसूल करण्यात आलाही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.*प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवी बाळगणाऱ्या 02 प्रकरणांची नोंद*मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मंगळवारी (ता28रोजी प्रतिबंधक प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या सतरंजीपुरा झोन अंतर्गत भगवती किराणा स्टोर्स बुधवारी बाजार मस्कासाथ ईतवारी आणि नेहरुनगर झोन अंतर्गत बागडे दही भंडार मिर्ची बाजार रोड सक्करदरा या दोन प्रतिष्ठानांकडुन एकुण 10  हजार  रुपयाचा दंड वसूल केला. याशिवाय लक्ष्मीनगर झोन अंतर्गत रीझ असोसिएट्स तात्या टोपे नगर व माऊली काम्पलेक्स बजाज नगर बांधकामाचा कचरा रस्त्यालगत पसरविलेल्याबाबत या दोन पतिष्ठानांकडुन एकुण 20 हजार रुपये दंड वसुल करण्यात आला. 
धरमपेठ झोन अंतर्गत लक्ष्मी हॅास्पिटल लक्ष्मी भुवन चौक बॉयो मेड कचरा रस्त्यालगत कचरा टाकलेबाबत यांच्याकडून 10 हजारांचा दंड वसूल करण्यात आला. गांधीबाग नगर झोन अंतर्गत जॉन सर क्लासेस मेयो समोर हास्पिटल बजेरिया परवानगी न घेता बॅनर आणि होर्डिग लावल्यास यांच्याकडुन 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. आशीनगर झोन अंतर्गत सिमरन मडके वैशाली नगर यांच्याकडुन रस्त्याच्या कडेला टिनशेडचे बांधकाम करणेबाबत हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. मंगळवारी झोन अंतर्गत हेंमत केवलरामानी पुंशी हास्पिटल जवळ जरिपटका कन्सट्रशन्स साईटवर सीवर लाईनला नुकसान केल्याबाबत यांच्याकडुन
 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. असे एकूण 8 प्रकरणांची नोंद करून 55 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. 

Friday, May 24, 2024

अंबाझरी तलाव आणि नाग नदीशी संबंधित आपत्ती निवारण कामाची उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी

 नागपूर:- नागपूर महानगरपालिकानागपूर सुधार प्रन्याससार्वजनिक बांधकाम विभागसिंचन विभाग आणि महा मेट्रो या विभागांद्वारे अंबाझरी तलाव आणि नाग नदीसंदर्भात सुरू असलेल्या विविध आपत्ती निवारण कामांची पाहणी आज शुक्रवार दि. २४ मे रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केली.या वेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरीअतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयलसिंचन विभागाचे मुख्य अभियंता श्री. पवारउपमुख्यमंत्री यांचे मानद सचिव श्री. संदीप जोशीमाजी नगरसेविका श्रीमती वर्षा ठाकरे यांच्यासह आपत्ती निवारणाशी संबंधित विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात आलेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या पूरसदृश्य स्थितीमुळे शहरातील अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते. यानंतर उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: मनपासह नासुप्रसार्वजनिक बांधकाम विभागसिंचन विभाग आणि महा मेट्रो या विभागांची बैठक घेउन आपत्ती निवारण कामाची आखणी केली होती. त्यानुसार त्यांनी आज अंबाझरी तलावअंबाझरी ते क्रेझी केसल पूलनाग नदीचे क्रेझी केसलअंबाझरी दहन घाटनासुप्र स्केटिंग रिंकरामदासपेठ पूल येथील पात्राचे आपत्ती निवारणाच्या दृष्टीने रुंदीकरण व खोलीकरण कामाची पाहणी केली. या वेळी पत्रकारांशी बोलताना श्री. फडणवीस म्हणालेसप्टेंबर महिन्यातील पुरानंतर विविध 
विभागांनी समन्वयाने काम केले. पुराची कारणेअडथळे यावर विचार करून कामे सुरू करण्यात आली आहेत. आपत्ती निवारणाच्या दृष्टीने अंबाझरी तलाव आणि नाग नदीशी संबंधित दीर्घकालीन आणि तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना करण्यात येत आहेत. तात्पुरत्या उपाययोजनांमध्ये या पावसाळ्यामध्ये पूरस्थिती निर्माण होउ नयेनिवासी भागांमध्ये पाणी जाउ नये यादृष्टीने कार्य केले जात आहे. दीर्घकालीन उपाययोजनांमध्ये तलावातील पाण्याची पातळी वाढू नये याकरिता तलावाच्या सांडव्यावरील भितींवर सिंचन विभागाद्वारे तीन दार लावले जाणार आहेत. अंबाझरी तलाव ते क्रेझी केसल यादरम्यानच्या पूलाचे काम सुरू असून एका बाजूचे काम लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहे. नासुप्र स्केटिंग रिंकवरील बांधकाम तोडून पात्राचे रुंदीकरण आणि खोलीकरण देखील करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी पाण्याला अडथळा निर्माण होतो तो देखील दूर करण्यात येत आहे. अंबाझरी दहन घाट परिसरातून नदीच्या पात्राची रुंदी वाढविण्यात येत आहे. एकूणच पावसाळ्यात नागरिकांना त्रास होउ नये यासाठी आवश्यक त्या सर्व आपत्ती निवारण उपाययोजनांवर काम सुरू असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.मा. उपमुख्यमंत्री यांच्या पाहणी दौ-यामध्ये आपत्ती निवारणाशी संबंधित विभागांचे अधिकारी मनपाचे अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवारडॉ. श्वेता बॅनर्जीकार्यकारी अभियंता श्री. नरेश बोरकरकार्यकारी अभियंता श्री. विजय गुरूबक्षाणीसिंचन विभागाच्या अधीक्षक अभियंता सोनाली चोपडेकार्यकारी अभियंता प्रांजली ठोंबसे आदी उपस्थित होते.

Thursday, May 16, 2024

अभिप्राय नोंदविण्यासाठी मनपाच्या २६ उद्यानात QR कोड आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी केली नव्या “क्यू आर कोड” प्रणालीची पाहणी

 नागपूर:- शहरातील उद्यानांची माहिती मिळावी व उद्यानासंदर्भात तक्रार थेट मनपाच्या उद्यान विभागाकडे पोहोचविता यावीया उद्देशाने नागपूर महानगरपालिकेने महत्वाचे पाऊल उचलले आहे. नागपूर महानगरपालिका तर्फे शहरातील २६ मोठ्या उद्यानात क्यू आर कोड बेस गार्डन फीडबॅक अँड कंप्लेंट रिड्रेसल सिस्टीमलावण्यात आले आहे. मनपा आयुक्त डॉ अभिजीत चौधरी यांनी गुरुवारी (१६) रोजी पूर्व नागपुरातील भारतमाता व डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे याची पाहणी केली. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल सुद्धा उपस्थित होत्या. आता नागपूरकर उद्यानात बसून त्याच उद्यानाची माहिती आणि उद्यान विकास संदर्भात आपला अभिप्राय एक एक क्यू आर कोड स्कॅन करून थेट महानगरपालिकेच्या उद्यान विभागात नोंदवू शकतात. मनपा आयुक्त डॉ चौधरी यांचा मार्गदर्शनात उद्यान विभागातर्फे शहरातील मेजर सुरेंद्र देव पार्क (धंतोली)सुर्वेनगर उद्यानराजीव गांधी उद्यानत्रिमूर्तीनगरसावरकर नगरज्ञानयोगी डॉ श्रीकांत जिचकार ट्रॅफिकपार्क उद्यानशिवाजीनगर उद्यानदगडी पार्कजागृत कॉलोनी खेळाचे मैदानके टी नगर 
नक्षत्र नगर उद्यानमहात्मा गांधी उद्यान हनुमान नगरबालभवन उद्यानगांधीसागर तलावसुभाष रोड,महात्मा फुले उद्यानसुयोग्य नगरत्रिशताब्दी उद्यानजुना नंदनवनसंत ज्ञानेश्वर संजीवन समाधी उद्यानदत्तात्रयनगरसंत तुकाराम उद्यान सक्करदरामहावीर उद्यान अजामशाह लेआऊटजुना बगडगंज उद्यानगांधीबाग उद्यानतुलसीनगर उद्यान
भारतमाता व डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानलता मंगेशकर उद्यानसूर्यनगरस्वतंत्र स्वराज जयंती उद्यान देशपांडे लेआऊटडॉ बाबासाहेब उद्यान वैशाली नगरॲड. सखारामपंत मेश्राम उद्यान (मंगळवारी) दयानंद पार्क जरीपटका येथे क्यू आर कोड बेस गार्डन फीडबॅक अँड कंप्लेंट रिड्रेसल सिस्टीम” लावण्यात आली आहे.




आयुक्त श्री चौधरी यांनी नागरिकांना या सिस्टीमचा वापर करून आपले अभिप्राय नोंद करण्याचे आवाहन केले आहे.आयटी विभागाचे श्री. स्वप्निल लोखंडे यांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांना संपूर्ण प्रणालीचे कार्य प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगितले. या अभिनव उपक्रमांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या २६ उद्यानांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर प्रवेश द्वारउद्यानातील बसण्याचे ठिकाणमुलांचे क्रीडांगणबाहेर जाण्याचा मार्ग अशा जवळपास चार ते पाच दर्शनीय 
जागेवर क्यू आर कोड” लावण्यात येणार आहेत. हा कोड मोबाईलवर स्कॅनकरून नागरिक उद्यानाची माहितीत्यासंदर्भाती तक्रारीविकासासाठीचे अभिप्राय थेट मनपाच्या उद्यान विभागआयटी विभागउद्यानातील संबंधित कंत्राटदार यांच्या पर्यंत पोहोचवू शकतो. 


मनपा आयुक्तांनी भारतमाता व डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानात मनपा तर्फे
फार वर्षापूर्वी बांधण्यात आलेली वास्तूचे सुद्धा निरीक्षण केले. सध्याच्या या वस्तूचा उपयोग होत नाही. या वास्तूच्या दुरुस्ती आणि रंग रंगोटी करून त्याला नवीनरूप देण्याचा निर्देश आयुक्तांनी दिले. त्यांनी उद्यानाचे मेन्टेनन्स बद्दल प्रशंसा केली आणि नागरिकांसाठी कचरा पेटी लावणे
फार वर्षापूर्वी बांधण्यात आलेली वास्तूचे सुद्धा निरीक्षण केले. सध्याच्या या वस्तूचा उपयोग होत नाही. या वास्तूच्या दुरुस्ती आणि रंग रंगोटी करून त्याला नवीनरूप देण्याचा निर्देश आयुक्तांनी दिले. त्यांनी उद्यानाचे मेन्टेनन्स बद्दल प्रशंसा केली आणि नागरिकांसाठी कचरा पेटी लावणेखेळण्याचे उपकरणची दुरुस्ती करणे इत्यादी निर्देश दिले. या प्रसंगी उपायुक्त डॉ रंजना लाडेआई टी विभागाचे संचालक श्री महेश धामेचासहायक आयुक्त श्री गणेश राठोडउद्यान अधीक्षक श्री अमोल चोरपगारकार्यकारी अभियंता श्री संजय माटेआणि माजी नगरसेवक श्री बाल्या बोरकर उपस्थित होते.मनापाद्वारे नागरिकांच्या सोयीसाठी क्यू आर कोड बेस गार्डन फीडबॅक अँड कंप्लेंट रीड्रेसल सिस्टीम ही प्रणाली प्रायोगिक तत्वावर मनपा क्षेत्रातील २६ उद्यानात लावण्यात आली आहे. याद्वारे नागरिक मोबाईलवर क्यू आर कोड स्कॅन करून उद्यानाचे परिसरउद्यानात असणारे विविध वृक्षफूल
द्यानात दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधाप्रसाधनगृह आदी विषयी माहिती मिळवू शकताततसेच उद्यानासंदर्भातील तक्रार देखील करू शकतात.  नागरिकांनी केलेली तक्रार एसएमएसद्वारे तक्रारकर्ताउद्यान विभाग आणि संबंधित कंत्राटदार यांच्या पर्यत पोहोचेल व समस्याचे निराकरण त्वरित करता येईल.

उष्माघात संदर्भातील दीर्घकालीन उपाययोजना बाबत कार्यवाहीवर भर द्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांचे निर्देश

नागपूर:- उष्माघात प्रतिबंधासंदर्भात तात्पुरत्या उपाययोजनांसोबतच दीर्घकालीन उपाययोजनांची देखील आवश्यकता आहे. वाढत्या तापमानाच्या दृष्टीने दीर्घकालीन उपाययोजनांचा आराखडा तयार करण्यासंदर्भात कार्यवाहीवर भर द्याअसे निर्देश अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी दिले.मनपा मुख्यालयात गुरूवारी (ता.१६) अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकारी समितीची बैठक पार पडली. आयुक्त सभाकक्षामध्ये झालेल्या बैठकीत मनपा उपायुक्त श्री. मिलींद मेश्रामउपायुक्त (समाज कल्याण) डॉ. रंजना लाडेसहायक पोलिस आयुक्त (वाहतूक) श्री. जयेश भांडारकरसहायक पोलिस आयुक्त विशेष शाखा श्री. नितीन जगतापअतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवारडॉ. विजय जोशीसाथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरेशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या सहायक प्राध्यापक डॉ. प्रगती भोळेशासकीय आयुर्वेदिक रुग्णालयाचे सहायक प्राध्यापक डॉ. आशिष राणाउद्यान अधीक्षक श्री. अमोल चौरपगारसहायक शिक्षणाधिकारी श्री. सुभाष उपासेसहायक आयुक्त सर्वश्री प्रकाश वराडेनरेंद्र बावनकरघनश्याम पंधरेगणेश राठोडहरीश राउतव्हीएनआयटीच्या प्रा. राजश्री कोठाळकरअग्निशमन विभागाचे श्री. तुषार बाराहातेडागा रुग्णालयाचे डॉ. प्रवीण नवखरेईएसआयएस हॉस्पिटलचे डॉ. एच.डी. कांबळे आदी उपस्थित होते. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्या मार्गदर्शनात उष्माघात प्रतिबंधात्मक कार्यवाही सुरु आहे.बैठकीत साथरोग 
अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे यांनी उष्माघात प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत माहिती दिली. १ मार्च ते ३० एप्रिल या कालावधीमध्ये नागपूर शहरात १६ दिवस तापमान ४० अंश किंवा त्यापेक्षा जास्त राहिले. नागपूर महानगरपालिकेद्वारे उष्माघात प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्यात आला. शहरातील मेडिकलमेयो तसेच मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयआयसोलेशल हॉस्पिटल आणि पाचपावली रुग्णालयासह ईएसआयएस रुणालयआयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये कोल्ड वार्ड तयार करण्यात आले. तसेच सर्व रुग्णालयांमध्ये पुरेसा औषधसाठा उपलब्ध करण्यात आला. याशिवाय शहरातील सिग्नलवर ग्रीन नेट लावण्यात आल्या. समाजविकास विभागाद्वारे बेघर व्यक्तींची निवारा केंद्रात व्यवस्था करण्यात आली. मनपाचे १६३ उद्याने दुपारच्या वेळेत सुरू ठेवण्यात आलीत. ३५०च्या वर ठिकाणी पाणपोईची व्यवस्था करण्यात आली. वाहतूक पोलिस विभागाद्वारे दुपारच्या वेळी सिग्नल बंद ठेवण्यात आले. १०८ क्रमांकाच्या  ११ आणि मनपाच्या ७ रुग्णवाहिका २४ तास तत्पर ठेवण्यात आलेल्या आहेत.  आदी सर्व माहिती डॉ. नवखरे यांनी सादर केली.वाढत्या उन्हापासून मनपाद्वारे करण्यात येत असलेल्या उपाययोजना या तात्पुरत्या स्वरूपात प्रभावीपणे कार्य करीत आहेत. मनपाच्या या उपाययोजनांमुळे अनेक नागरिकांना दिलासा देखील मिळतो आहे. मात्र झपाट्याने होत असलेले वातावरणातील बदल आणि त्याचा मानवी जीवनावर परिणाम लक्षात घेता उष्माघाताच्या संदर्भात दीर्घकालीन उपाययोजनांची गरज असल्याचे मत यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी व्यक्त केले. यासाठी आराखडा तयार करण्याबाबत कार्यवाही करण्याचेही त्यांनी निर्देशित केले. तेलंगणाच्या धर्तीवर नागपूरमध्येही ‘कूल रूफचे धोरण तयार करण्याची आवश्यकता असल्याचेही श्रीमती गोयल म्हणाल्या. व्हीएनआयटीच्या प्रा. राजश्री कोठाळकर यांनी दीर्घकालीन उपाययोजनांबाबत अनेक सूचना मांडल्या.

भारत की राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मु का गणतन्त्र दिवस पर राष्ट्र के नाम संबोधन

मेरे प्यारे देशवासियो , नमस्कार! देश और विदेश में रहने वाले , हम भारत के लोग , उत्साह के साथ , गणतन्त्र दिवस का उत्सव मनाने जा रहे हैं। मै...