Tuesday, February 11, 2025

शिक्षणोत्सवातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा विकास -माननीय शिक्षक आमदार श्री सुधाकर अडबाले

नागपूर:- विद्यार्थ्यांमध्ये सुप्त गुण असतात अशा सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या  शिक्षणोत्सवाचा पंधरवाडा हा विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी अत्यंत महत्वाचा ठरला असल्याचे प्रतिपादन माननीय शिक्षक आमदार श्री सुधाकर अडबाले यांनी केले.नागपूर महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने रेशिमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात सोमवारी (ता. १० फेब्रुवारी) शिक्षणोत्सव २०२४-२५’ चा समारोपाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माननीय शिक्षक आमदार श्री सुधाकर अडबाले बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनपा आयुक्त आणि प्रशासक डॉ. अभिजित चौधरी होते. मंचावर अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल,  शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयामसहायक आयुक्त श्री नरेंद्र बावनकर, क्रीडा अधिकारी श्री पियूष आंबुलकर, क्रीडा नियंत्रण अधिकारी नियंत्रण अधिकारी श्री. नितीन भोळे, शिक्षक संघाचे सचिव श्री देवराव मांडवकर, सहायक 
शिक्षणाधिकारी श्री. सुभाष उपासे, श्री. संजय दिघोरे, मुख्य समन्वयक विनय बगले, अनिता भोतमांगे, प्रशांत टेंभुर्णे व इतर उपस्थित होते. याप्रसंगी शिक्षणोत्सवामध्ये आयोजित विविध सांस्कृतिक क्रीडा आणि इतर स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आले.नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित शिक्षणोत्सव २०२४-२५ अंतर्गत
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी 22 जानेवारी ते 7 फेब्रुवारी दरम्यान विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.शिक्षणोत्सव २०२४-२५’ चा  समारोपाप्रसंगी मा. आमदार श्री सुधाकर अडबाले म्हणाले कीनवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांचा कला गुणांचा आणि त्यांच्या सुप्त गुणांचा अधिक विकास होणार आहे. विद्यार्थ्यांना मोठे व्हायचे असेल तर कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर चांगले विद्यार्थी घडू शकतात. विद्यार्थ्यांचा विकास करायचा असेल तर चार भितींच्या बाहेर जाऊन विकास करायला हवा असेही ते म्हणाले. विद्यार्थी हा आपला केंद्र असून विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास करणे महत्वाचे आहे असेही ते म्हणाले. महानगरपालिकेची शाळा उच्च दर्जाची होऊ शकते असा विश्वास त्यांनी व्यक्त




केला. या महिन्यात परीक्षा सुरु होणार असल्याने त्यांनी विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या परीक्षेला समोरे जावे असे मार्गदर्शन सुद्धा केले.अध्यक्षीय भाषणात मनपा आयुक्त आणि प्रशासक डॉ. अभिजित चौधरी म्हणाले की, शिक्षणोत्सव अंतर्गत चांगल्या दर्जाच्या स्पर्धा आयोजित करण्यात आले. जिंकणे किंवा हरणे हा शिक्षणोत्सवाचा उद्देश नाही तर सर्वांचा अधिकाधिक सहभाग वाढला पाहिजे. दैनंदिन शैक्षणिक कार्यासोबत विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा हा त्या मागचा उद्देश आहे. शिक्षणोत्सव अंतर्गत सहभागी असलेले सर्वजण विजेते आहेत, शिक्षणोत्सवक्रीडा महोत्सव सारखे उपक्रम राबवून सांघिक भावना निर्माण होते शिवाय अपयशातून बाहेर कसे यावेहेही विद्यार्थ्यांना अशा उपक्रमातून शिकता येते. 
सुदृढ आणि संतुलित व्यक्ती बनण्यासाठी असे उपक्रम हातभार लावत असतात. पुढील शिक्षणोत्सव अधिक चांगल्या रितीने करू असाही विश्वास आयुक्तांनी दाखविला. शाळा विकासासाठी शिक्षक हा महत्वाचा घटक आहे. याकरिता शाळांचे मुल्यमापन केले जाईल. ज्या शाळा उत्कृष्टरित्या कार्य करतील अशा शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांचा सत्कार महानगरपालिकातर्फे करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. यातून हेल्थी स्पर्धा सुरु होईल असा विश्वासही आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी व्यक्त केला.यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल म्हणाल्या कीगेल्या दीड वर्षांपासून शाळा आणि विद्यार्थ्यांकरिता वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहे. शाळा सर्वेपायाभूत विकासडिजिटल क्लासरुमनव्या क्रीडा आणि संगीत शिक्षकांची




नियुक्ती यामुळे शाळांमध्ये मोठे बदल होत आहेत. एक नवीन ऊर्जा तयार झाली आहे,. आम्ही एक नवीन चेतना निर्माण  करण्यात यशस्वी झालो आहोत. यामुळे शाळांच्या पटसंख्येत निश्चित वाढ होणार आहे. वर्गात शिस्त शिकता येते परंतू शिक्षणाशिवाय विविध उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्यक्ष फिल्डवर विद्यार्थी टीमवर्क
यशस्वी होण्याकरिता आणि चारित्र बांधणीकरीता आवश्यक असलेले गुण शिकू शकतात. अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांसह महानगरपालिका शाळाचाही आत्मविश्वास वाढेल असेही श्रीमती आंचल गोयल यावेळी म्हणाल्या. परीक्षेची चांगली तयारी करा अशा शुभेच्छाही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिल्यात.प्रास्ताविक शिक्षणाधिकारी साधना सयाम यांनी केलेसूत्रसंचालन मधु पराडशुभांगी पोहरेप्रतिभा लोखंडे यांनी केलेतर आभार शिक्षणोत्सवचे मुख्य समन्वयक श्री. विनय बगले यांनी मानले. सोमवारी (ता. १० फेब्रुवारी) रेशिमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात शिक्षणोत्सवाचा समारोप झाला. कार्यक्रमात सुरुवातीला मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते व अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरेश भट सभागृहात आर्ट गॅलरी येथे चित्रकलाहस्तकला स्पर्धेतील उत्क़ृष्ट चित्र मॉडेल आणि विज्ञान प्रदर्शनीचे उदघाटन करण्यात आले. यावेळी आयुक्तांनी  प्रदर्शनीचे पाहणी केलीविद्यार्थ्यांशी संवाद साधला तसेच आयुक्त डॉ.अभिजित चौधरी यांनी स्वतः पेंटींग करत मुलांचा उत्साह वाढला. त्यानंतर सभागृहात मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन झाले.  जयताळा मनपा शाळा विद्यार्थ्यांमार्फत स्वागत गीत सादर करण्यात आले. त्यानंतर सावित्रीबाई फुलेसरस्वती यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आले. यावेळी शिक्षणोत्सव अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमाची व स्पर्धांची चित्रफित दाखविण्यात आली. त्यानंतर सांस्कृतिक स्पर्धेतील उत्कृष्ट समुहगान व नृत्याचे  सादरीकरण करण्यात आले.  समूहगीत एम.ए.के आझाद (9ते11) आणि पारडी मराठी उच्च प्राथमिक उच्च माध्यमिक शाळा (6ते8) यांनी सादर केले. लोकनृत्य पन्नालाल देवडिया हिंदी माध्यमिक शाळातर्फे सादर करण्यात आले.यावेळी मार्च २०२३ आणि २०२४ इयत्ता १०वी व १२वी मध्ये शाखानिहाय तसेच माध्यमनिहाय सर्व प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना गोल्ड कॉईन व २५००० चे धनादेश देऊन गुणगौरव करण्यात आला.  त्यानंतर बौध्दीक स्पर्धेतील ६ स्पर्धामधील निवडक ६ विजेत्यांना गोल्ड मेडल देण्यात आले. सांस्कृतिक स्पर्धेतील  इयत्ता ६ ते ८ वयोगटातील स्पर्धेचा प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्याना गोल्ड मेडल  व शाळेला मोमेन्टो  (५मी) देण्यात आले.क्रीडा स्पर्धेतील खो-खो विजेते (मुले / मुली) संजयनगर माध्यमिक शाळेला गोल्ड मेडल आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.विभागस्तरीय शालेय तलवारबाजी क्रीडा स्पर्धा मनपा नेताजी मार्केट हिंदी माध्यमिक शाळा येथील कु.चंचल धापडे हिने उत्कृष्ट कामगीरी करुन कांस्य पदक पटकाविले. तिचा गुणगौरव यावेळी करण्यात आला.राष्ट्रीय स्तरावर फुटबॉल खेळात निवड झालयाबददल पारडी मराठी उच्च प्राथमिक शाळेची हिना कोलते हिचा गुणगौरव करण्यात आला.युनेस्को कडून जागतीक स्तरावर आयोजीत चित्रकला स्पर्धेत पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

Thursday, February 6, 2025

बर्ड फ्ल्यू संदर्भात मनपाद्वारे प्रतिबंधात्मक उपाययोजना

नागपूर:नागपूर शहरातील ताजबाग यासिन प्लॉट परिसरातील तीन पक्ष्यांचा बर्ड फ्ल्यू मुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. यानंतर नागपूर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाद्वारे परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. बर्ड फ्ल्यू केवळ पक्ष्यांना होणारा आजार आहे मात्र त्यापासून सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांनी सतर्क राहून दिशानिर्देशांचे पालन करावेअसे आवाहन नागपूर महानगरपालिकेद्वारे करण्यात येत आहे. बुधवारी ५ फेब्रुवारी रोजी शहरातील ताजबाग यासिन प्लॉट परिसरातील तीन पाळीव पक्ष्यांचा मृत्यू झाला. या पक्ष्यांचे नमूने प्रयोगशाळेमध्ये पाठविण्यात आले असता त्याचा अहवाल बर्ड फ्ल्यू पॉझिटिव्ह प्राप्त झाला. यावर मनपा 
आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या. मृत पक्ष्यांच्या थेट संपर्कात असलेल्या कुटुंबातील सदस्यांची मनपाद्वारे आरोग्य तपासणी करण्यात आली. सर्व व्यक्तींचे आरोग्य उत्तम आहे. मात्र प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मनपाद्वारे त्यांना औषधे सुरु करण्यात आली आहेत. मृत पक्ष्यांच्या संपर्कातील पक्ष्यांवर ‘कलिंग’ प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रक्रियेमध्ये सहभागी कर्मचाऱ्यांवर देखील प्रतिबंधात्मक औषधोपचार सुरु करण्यात आले आहेअशी माहिती मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी
दिली.शहरातील ताजबाग यासिन प्लॉट परिसरातील मृत पक्ष्यांच्या संपर्कातील ३०५४ पक्ष्यांवर ‘कलिंग’ प्रक्रिया राबविण्यात आली. याशिवाय १८० अंडी आणि १००० किलो खाद्य नष्ट करण्यात आले. बर्ड फ्ल्यू हा आजार केवळ पक्ष्यांमध्येच आढळून येत असतो. मात्र सर्तकता आणि सुरक्षेच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे बाधित क्षेत्रात घरोघरी सर्वेक्षण करण्यात येत आहे. यात प्रामुख्याने इन्फ्ल्युएन्झा सदृश्य रुग्णांचा शोध घेऊन आवश्यकतेनुसार प्रयोगशाळा नमूने गोळा करण्यात येत आहेत. तसेच सर्व खाजगी रुग्णालय व वैद्यकीय व्यवसायिकांना त्यांच्या आरोग्य

संस्थेतील ‘आयएलआय’  ‘सारी’ रुग्णांची माहिती मनपाच्या आरोग्य विभागाला द्यावीअसे आवाहन वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी केले आहे.बर्ड फ्ल्यू हा आजार भारतात आजपर्यंत कोणत्याही मनुष्यामध्ये आढळून आलेला नाही. मात्र जागतिक स्तरावर तुरळक प्रकरणांची नोंद झालेली आहे. या अनुषंगाने नागरिकांनी काळजी घ्यावीअसे आवाहन नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.  अशी घ्या काळजी हे करा:- १. पक्ष्यांमधील स्त्रावासोबत संपर्क टाळा. २. पक्षीकोंबड्या यांचे पिजंरे आणि ज्या भांड्यामध्ये त्यांना रोज अन्न दिले जाते अशी भांडी रोज डिटर्जन्ट पावडर ने धुवा. शिल्लक उरलेल्या मांसाची योग्य विल्हेवाट लावा. ३. एखादा पक्षी मरण पावला तर अशा पक्ष्यांना उघड्या हाताने स्पर्श करु नका.४. कच्च्या पोल्ट्री उत्पादनासोबत काम करताना पाणी व साबणाने हात वारंवार धुवाव्यक्तीगत स्वच्छता राखापरिसर स्वच्छ ठेवा.५. कच्चे चिकन/चिकन उत्पादनासोबत काम करताना मास्क आणि ग्लोव्हजचा वापर करावा.६. पूर्ण शिजविलेल्या (१०० डिग्री सेल्सीअस) मांसाचाच
 अन्नात वापर करावा.७. आपल्या गल्लीत अथवा परिसरात तलाव असेल आणि त्या तलावात पक्षी येत असतील तर या ठिकाणी सुयोग्य प्रतिबंधात्मक उपाययोजनासाठी वन विभाग/ पशुसंवर्धन विभागास कळविण्यात यावे. हे करु नका:- १. कच्चे चिकन / कच्ची अंडी खाऊ नका.२. अर्धवट शिजलेले चिकन/पक्षीअर्धवट उकडलेली अंडी खाऊ नका.३. आजारी दिसणाऱ्यासुस्त पडलेल्या पक्ष्याच्या संपर्कात येऊ नका.४. पूर्णपणे शिजलेले मांस आणि कच्चे मांस एकत्र ठेऊ नका.  

अतिक्रमण निर्मूलन कारवाई,नागपूर महानगरपालिका नागपूर (प्रवर्तन विभाग)

म.न.पा प्रवर्तन विभाग मार्फत आज दिनांक 06.02.2025 रोजी लक्ष्मीनगर झोन क्र ०१ अंतर्गत पथक क्र.३, आणि पथक क्र.५ यांनी मिळुन संयुक्तरीत्या अतिक्रमण निर्मूलन कारवाई दुपारी 1:00 वाजेपासून ते सायंकाळी 9:00 वाजेपर्यंत कारवाई सुरू आहे .कारवाई मध्ये झोन कार्यालय ते रेडीसनब्लु हॉटेल चौक ते खामला रोडे ते जयताळा चौक ते त्रिमुर्ती नगर चौक ते प्रताप नगर चौक ते लक्ष्मीनगर चौक ते आठ रस्ता चौक ते माटे चौक ते VNIT IT पार्क चौक ते बजाज नगर चौक ते ईस्ट हायकोर्ट रोड ते लोकमत चौक पर्यंत 
अतिक्रमण निर्मूलन ची कारवाई करण्यात येत आहे ज्यामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजू वरील रोड व फूटपाथ वर अवैध पद्धतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविण्यात येत आहे. कारवाई मध्ये अतिक्रमण धारकांची संख्या 50 वर सुद्धा अतिक्रमण पथकाद्वारा कारवाई करण्यात येत आहे आणि कारवाई मध्ये आतापर्यंत 02 ट्रक साहित्य जप्त करण्यात आले आहे आणि कारवाई सुरू आहे. • धरमपेठ झोन क्र ०२ अंतर्गत पथक क्र.४ आणि पथक क्र ०२ यांनी संयुक्तरित्या अतिक्रमण निर्मूलन कारवाई दुपारी 12:00 वाजेपासून ते सायंकाळी 9:00 वाजेपर्यंत सुरू आहे 








अंतर्गत झोन कार्यालय ते सीताबर्डी परिसर ते झासीराणी चौक ते पंचशील चौक ते मेहाडीया चौक ते लोकमत चौक ते अंजनी रेल्वे स्टेशन पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजू वरील रोड व फूटपाथ वर अवैध पद्धतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविण्यात येत आहे. कारवाई मध्ये अनधिकृत बांधकामाची धारकांची संख्या अंदाजे 30 वर सुद्धा अतिक्रमण ची करवाई करण्यात येत आहे आणि कारवाई मध्ये 01 ट्रक साहित्य सामान जप्त करण्यात आले आणि कारवाई सुरू आहे. ही कारवाई .श्री. हरिष राऊत सहा. आयुक्त अतिक्रमण विभाग यांचे मार्गदर्शनात श्री भास्कर माळवे कनिष्ठ अभियंता आणि अतिक्रमण पथक द्वारे करण्यात आली.

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 113 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. गुरुवार (06) रोजी शोध पथकाने 113 प्रकरणांची नोंद करून 57,700/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 32 प्रकरणांची नोंद करून 12,800/- रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 9 प्रकरणांची नोंद करून 3,600/- रुपयांची वसुली करण्यात आली. मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींग हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालय, कॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 1 
प्रकरणांची नोंद करून 2,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 14 प्रकरणांची नोंद करून 17,500/- रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी जनावरे बांधणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 1,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 44 प्रकरणांची नोंद करून 8,800/- दंड वसूल करण्यात आलेला आहे.
उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 12 प्रकरणांची नोंद करून 12,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. तसेच उपद्रव शोध पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत मे. कॅरियर पॉईंट यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी रु. 10,000/- चे दंड वसुल करण्यात आला. तसेच मे. राजेश रोकडे यांनी बांधकामाचे साहित्य फुटपाथवर टाकल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. धंतोली झोन अंतर्गत मे. सादवाणी यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. गांधीबाग झोन अंतर्गत मे. किशोर किराणा स्टोर यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. विजय किराणा स्टोर यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. उपद्रव शोध पथकाने 5 प्रकरणांची नोंद करून रू. 30,000/- दंड वसूल केला.

Monday, February 3, 2025

गुरुमाऊली भजनी मंडळ खासदार भजन स्पर्धेचे महाविजेते केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण

नागपूर:- केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आयोजित खासदार भजन स्पर्धेची महाअंतिम फेरी रविवार दि. २ फेब्रुवारी २०२५ ला घेण्यात आली. या स्पर्धेत जुने कैलाश नगर येथील गुरुमाऊली भजन मंडळ महाविजेते ठरले. या मंडळाला २१ हजार रुपये रोख व गौरवचिन्ह प्रदान करण्यात आले. ना. श्री. गडकरी यांच्या हस्ते सर्व पुरस्कार विजेत्या मंडळांना गौरविण्यात आले.रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहाल महाअंतिम फेरी आयोजित करण्यात आली. सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये झालेल्या प्राथमिक फेरीतून सर्वोत्तम २० भजनी मंडळांची महाअंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली.पुरस्कार वितरण 
सोहळ्याला आमदार प्रवीण दटके, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, माजी महापौर अर्चना डेहनकर, खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे जयप्रकाशजी गुप्ता, महिला आघाडीच्या अध्यक्ष प्रगती पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. ७ ते १२ जानेवारी दरम्यान घेण्यात आलेल्या प्राथमिक फेरी स्पर्धेत नागपुरातील ६ विभागांतील ५८३ भजनी मंडळांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. सर्व भजनी मंडळींद्वारे श्रीकृष्ण भक्तीचा जागर करण्यात आला. खासदार भजन स्पर्धेत नागपुरातील सहभागी ५८३ भजनी मंडळांना प्रत्येकी १५००/- रुपये मानधन आणि प्रमाणपत्र देण्यात आले .भजन स्पर्धेचे संयोजन डॉ. श्रीरंग वराडपांडे यांनी केले.
खासदार भजन स्पर्धेच्या यशस्वितेसाठी अमोल ठाकरे, विश्वनाथ कुंभलकर, माया हाडे, सपना सागुळले, श्वेता निकम, श्रधा पाठक, रेखा निमजे, विजय येरणे, दर्शना नखाते, सुजाता कथोटे, अभिजित कठाले, श्री. ढबले, अतुल सगुळले आदींनी परीश्रम घेतले. स्पर्धेचा निकाल प्रथम क्रमांक - गुरुमाउली भजन मंडळ, जुने कैलास नगर (२१ हजार रुपये रोख) द्वितीय क्रमांक - सुरस्वरांगिणी भजन मंडळ, मानकापूर (१५ हजार रुपये रोख) तृतीय क्रमांक - रत्नक्षी भजन मंडळ (११ हजार रुपये रोख) चतुर्थ क्रमांक - स्वामी समर्थ भजन मंडळ रेशिमबाग (७ हजार रुपये रोख) पाचवा क्रमांक - स्वामी सुमीरन भजन मंडळ, वासुदेव नगर (५ हजार रुपये रोख) युवा गट:- प्रथम क्रमांक - सारस्वत भजन मंडळ (१५ हजार रुपये रोख) द्वितीय क्रमांक - स्वरा भजन मंडळ, महाल (११ हजार रुपये रोख)

मनपाच्या शालेय क्रीडा स्पर्धेचे थाटात उद्घाटन आमदार प्रवीण दटके, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, आंतरराष्ट्रीय खेळाडू राजू गायकवाड, शुभम पालकर यांची उपस्थिती

नागपूर:- नागपूर महानगरपालिकेतील शालेय विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा विषयक जागरूकता निर्माण करणे आणि त्यांच्यामध्ये खेळाडू भावना निर्माण करण्याच्या दृष्टीने मनपाच्या शिक्षण विभागातर्फे शिक्षणोत्सव अंतर्गत प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे  उद्घाटन सोमवारी (ता.३) मध्य नागपूरचे आमदार श्री. प्रवीण दटके यांच्या हस्ते चिटणीस पार्क येथे झाले. याप्रसंगी मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयलआंतराष्ट्रीय खेळाडू श्री राजू गायकवाड आणि श्री शुभम पालकरउपायुक्त श्री. गणेश राठोडशिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयाम प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना आमदार श्री. दटके यांनी, मनपा शिक्षण विभागातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याकरिता शिक्षण 
विभागाचे कौतुक केले. ते म्हणाले कीएकेकाळी मनपाच्या क्रीडा स्पर्धा बघण्यासाठी गर्दी होत होती. ही परंपरा परत सुरु होत असल्याने आनंद होत आहे. त्यांनी मध्य नागपुरातील बंद पडलेल्या शाळांना सुरु करण्यासाठी आमदारनिधी मधून निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी उपस्थित फुटबॉलचे आंतरराष्ट्रीय खेळाडू श्रीराजू गायकवाड आणि अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी सुद्धा मुलांना शुभेच्छा दिल्यात. 

यावेळी क्रीडा अधिकारी डॉ. पीयूष आंबुलकरआकांक्षा संस्थेचे संचालक श्री सोमसूर्व चॅटर्जीसहायक शिक्षणाधिकारी श्री सुभाष उपासेश्री संजय दिघोरेश्री विनय बगलेश्रीमती अर्चना भोतमांगे उपस्थित होते. सर्वप्रथम हॉकीचे जादूगर स्व.ध्यानचंद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. तिरंगा रंगाचे फुगे आकाशात सोडण्यात आले.




कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका श्रीमती मधू पराड यांनी केले.नागपूर महानगरपालिकेद्वारे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या नेतृत्वात शिक्षणोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.  सोमवार आणि ४ फेब्रुवारी २०२५ रोजी महाल येथील चिटणीस पार्क येथे इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांकरिता तर ५ ते ७ फेब्रुवारी २०२५ रोजी धंतोली येथील यशवंत स्टेडियम येथे

इयत्ता सहावी ते आठवी आणि नववी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांकरिता विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.चिटणीस पार्क नागपूर येथे सकाळी मशाल दौडने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मनपा आकांक्षा इंग्रजी माध्यम शाळेतील विद्यार्थांनी मुख्य अतिथींना एस्कॉर्ट करून व्यासपीठावर आणले. यानंतर सर्वांनी क्रीडा प्रतिज्ञा (sports pledge) घेतली. क्रीडा स्पर्धांमध्ये मनपा शाळेतील इयत्ता १ ते ५चे जवळपास ७९५ विद्यार्थांनी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेत आहे. सोमवारी ५० मी दौडमध्ये ८० शाळेचे विद्यार्थी भाग घेतला तसेच बुक बॅलेन्समध्ये ५८ शाळेचे विध्यार्थ्यानी भाग घेतला. ऑब्स्टॅकल दौडमध्ये ५४ शाळेचे विद्यार्थी
तीन पायाची दौडमध्ये २९ शाळेचे विद्यार्थीस्टिक बॅलेन्समध्ये २५ शाळासॅक रेसमध्ये ५६ शाळारोलर टॅंकमध्ये ४८  शाळांनी भाग घेतला.  ४ फेब्रुवारी रोजी मुलांची कबड्डी व मुलींची लंगडी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.५ ते ७ फेब्रुवारी रोजी यशवंत स्टेडियमला इयत्ता ६ ते ८ आणि ९ ते  ११ वी च्या विद्यार्थ्यांच्या  क्रीडा स्पर्धा घेण्यात येतील. यावेळी रस्सी खेच (१० ते १५ टीम मेंबर)१०० मी दौडशॉट पुटडिस्क थ्रोखो-खो  हे खेळ ५  फेब्रुवारी रोजी घेण्यात  येतील. कबड्डीव्हॅलीबॉललंगडीक्रिकेट हे खेळ ६ फेब्रुवारी रोजी घेण्यात येतील तर फुटबाँलकॅरम आणि चेस हे खेळ ७ फेब्रुवारीला घेण्यात येतील. शिक्षणोत्सव कार्यक्रमाचा समारोप १० फेब्रुवारी रोजी कविवर्य सुरेश भट्ट सभागृहामध्ये होणार आहे.

Sunday, February 2, 2025

एम्स’ येथे आंतरराष्ट्रीय ‘फिस्ट २०२५’ आंतराष्ट्रीय परिषद,आदिवासी जिल्ह्यांचे मागासलेपण दूर होणे गरजेचे …केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी

 
नागपूर:- आदिवासी भागांमधील सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपण दूर करणे हे आपल्यापुढील सर्वांत मोठे आव्हान आहे. त्यादृष्टीने सरकार सातत्याने काम करत आहे. आदिवासीबहुल जिल्ह्यांच्या विकासाला सर्वाधिक प्राधान्य देण्यात येत आहे. परंतु, सर्वसमावेशक विकासासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (रविवार) येथे केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने एम्सनागपूर येथे आंतरराष्ट्रीय फिस्ट-२०२५या आंतराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ना. श्री. गडकरी बोलत होते. 
यावेळी विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त),  ‘एम्सनागपूरचे संचालक डॉ. प्रशांत जोशी, परिषदेचे संयोजक डॉ. संजीव चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘आदिवासी भागांमधील परिस्थिती गंभीर आहे. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात अनेक अडचणी आहेत. त्यामुळेच सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपणाने या जिल्ह्यांना ग्रासले आहे. आज देशाच्या जीडीपीमध्ये सेवा क्षेत्राचे ५२ ते ५६ टक्के, मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचे २२ ते २४ टक्के आणि ग्रामीण क्षेत्राचे १२ ते १३ टक्के योगदान आहे. हे योगदान वाढविण्यासाठी सरकारने दुर्गम भागांमधील विकासाला प्राधान्य दिले आहे. त्यादृष्टीने ५०० ब्लॉक्स निश्चित केले 
आहेत.ते म्हणाले, ‘आदिवासी भाग बहुतांशी वनांनी व्यापलेला आहे. त्यामुळे रस्ते, सिंचनाच्या सुविधा निर्माण करण्यात अडचणी येतात. आदिवासी भागांचा सर्वसमावेशक विकास आवश्यक आहे. त्यासाठी रोजगाराच्या संधी निर्माण कराव्या लागतील. गेल्या २५ वर्षांपासून स्व. लक्ष्मणराव ट्रस्टच्या माध्यमातून गडचिरोलीमध्ये आम्ही १६०० एकल विद्यालये चालवत आहोत. याठिकाणी १८०० शिक्षक आहेत. 
चांगले शिक्षण मोठे परिवर्तन घडवू शकते याचा आम्ही अनुभव घेत आहोत.सूरजागडमध्ये चांगल्या दर्जाचे लोहखनिज आहे. तिथे पोलाद 
प्रकल्प सुरू झाला आहे. दहा हजार लोकांच्या रोजगाराचा मार्ग मोकळा झाला. पूर्वी हा परिसर नक्षलवाद्यांचा गड समजला जायचा. आता ५०० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आणि त्यांना रोजगारही देण्यात आला आहे. भविष्यात इंजिनियरिंग कॉलेज, पॉलिटेक्निक कॉलेज, ड्रायव्हिंग स्कूल होतील. आदिवासी क्षेत्रातील विकासाचा प्रश्न अशाच प्रयत्नांमधून सुटणार आहे, असेही ना. श्री. गडकरी म्हणाले.
 

अजीत बेकरी के नए शोरूम और फूड जंक्शन का उद्घाटन केन्द्रीय मंत्री नितिन गडकरी द्वारा

 
नागपुर:- बीते  सात दशकों से गुणवत्ता और स्वाद का प्रतीक "अजीत" ब्रांड ने , नागपुर के वर्धा रोड के अजनी चौक पर अपने नए, अत्याधुनिक शोरूम और मल्टीकुजीन रेस्टोरेंट फूड जंक्शन का उद्घाटन केंद्रीय सड़क परिवहन और राजमार्ग मंत्री माननीय श्री नितिन गडकरी की विशेष उपस्थिति ने इसे अवसर को विशेष और यादगार बना दिया। अजीत बेकरी की स्थापना 1955 में एक पारिवारिक स्वामित्ववाले व्यवसाय के रूप में की गई थी। गुणवत्तापूर्ण और अभिनव बेकरी उत्पाद उपलब्ध कराने के मिशन के साथ शुरू की गई अजीत बेकरी ने जल्द ही अपने स्वाद और गुणवत्ता के साथ शहर में अपनी पहचान बना ली। 1987 में बढ़ती मांग को पूरा करने के लिए एक नई विनिर्माण सुविधा स्थापित की गई, जिससे अजीत बेकरी की प्रतिष्ठा और मजबूत हुई। अजीत ब्रांड उच्च गुणवत्ता वाली सामग्री, नवीन व्यंजनों और ग्राहक संतुष्टि के प्रति प्रतिबद्धता के साथ अपने अनुभव को समृद्ध करना जारी रखता है। अजीत ब्रांड बेकरी क्षेत्र में 
नवीन विचार लाकर खाद्य प्रेमियों पर अपनी छाप छोड़ रहा है। उद्घाटन समारोह में अजीत के निदेशक विक्रम दिवाडकर, मीरा दिवाडकर, अवंती देशमुख, महेंद्र पेंढारकर के साथ-साथ खाद्यप्रेमी, 'अजीत' के वफादार ग्राहक और विभिन्न गणमान्य व्यक्ति उपस्थित थे। 
उपस्थित लोग अजीत की गुणवत्ता और रुचि को समकालीन परिष्कार के साथ संयोजित करने वाले नवाचारों और आकर्षक डिजाइनों से मंत्रमुग्ध हो गए। उपस्थित लोगों ने फूड जंक्शन के बेकरी उत्पादों और व्यंजनों का आनंद लिया। अजीत चार प्रमुख क्षेत्रों में काम करता है: मिठाई, बेकरी, स्नैक्स और नमकीन। नये शोरूम में अजीत के प्रसिद्ध उत्पादों की विस्तृत श्रृंखला उपलब्ध है। इसमें विभिन्न प्रकार की मिठाइयाँ और स्नैक्स शामिल हैं जैसे पाव, डोनट्स, रस्क, खारी, कुकीज, मफिन, क्रीम रोल, सेलिब्रेशन केक, बार केक, नमकीन, फ्राइज़, चिप्स, वऱ्हाडी चिवड़ा, सावजी चिवड़ा। इस कार्यक्रम को संबोधित करते हुए श्री नितिन गडकरी ने अजीत ब्रांड के स्वाद और गुणवत्ता की प्रशंसा की। उन्होंने नए फूड जंक्शन की भी प्रशंसा की, जिसे नवीन विचारों के आधार पर बनाया गया है। विक्रम दिवाडकर ने आभार व्यक्त करते हुए कहा, "हमने अपने ग्राहकों के लिए अजीत के बेकरी उत्पादों में उत्कृष्टता के लिए एक मानक स्थापित किया है और हम भविष्य में और अधिक नवीन और गुणवत्तापूर्ण उत्पाद लाने के लिए प्रतिबद्ध हैं।" उन्होंने विदर्भ और मध्य भारत में लाखों लोगों के बीच अजीत को एक विश्वसनीय ब्रांड बनाने में उनके अटूट समर्पण के लिए स्वर्गीय अजीत दिवाडकर को श्रद्धांजलि अर्पित की। अजीत के विशाल ग्राहक आधार के लिए धन्यवाद देते हुए उन्होंने इस आकर्षक नए आउटलेट के माध्यम से और अधिक नए ग्राहकों को आकर्षित करने के बारे में आशा व्यक्त की।

भारत की राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मु का गणतन्त्र दिवस पर राष्ट्र के नाम संबोधन

मेरे प्यारे देशवासियो , नमस्कार! देश और विदेश में रहने वाले , हम भारत के लोग , उत्साह के साथ , गणतन्त्र दिवस का उत्सव मनाने जा रहे हैं। मै...