Tuesday, March 18, 2025

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 45 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे.  मंगळवार (18)  रोजी शोध पथकाने  45  प्रकरणांची नोंद करून  रु. 31,300/- रुपयाचा दंड  वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु.400/- दंड) या अंतर्गत 17  प्रकरणांची नोंद करून  रु.6,800/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून रु.200/- रुपयांची वसुली ‍करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून रु.1,200/- रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या 
अंतर्गत 18 प्रकरणांची नोंद करून रु.15,500/- रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 18 प्रकरणांची नोंद करून रु.3,600/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 4 प्रकरणांची नोंद करून रु.4,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. तसेच उपद्रव शोध पथकाने धरपेठ नगर झोन अंतर्गत मे.श्री. सतगुरु डेव्लपर्स यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रु. 10,000/- चे दंड वसुल करण्यात आला. नेहरू नगर झोन अतंर्गत श्री. हरी अपार्टमेंट यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रु.10,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला व मे. मॉ वैष्णवी डेव्लपर्स यांनी रस्त्यावर सी अँड डी कचरा टाकल्याबद्दल रू. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आला.  उपद्रव शोध पथकाने 03 प्रकरणांची नोंद करून रू. 25,000/- दंड वसूल केला. 
 

Monday, March 17, 2025

शहर के 3100 पेड़ खुल कर सांस ले सकेंगे नगर निगम शुरू करेगा विशेष अभियान

नागपुर:-  नागपुर शहर की सड़कों और फुटपाथों पर लगे पेड़  नागपुर महानगर पालिका द्वारा जीवन रक्षक प्रणाली उपलब्ध कराने के लिए महत्वपूर्ण कदम उठाए गए हैं  नगर आयुक्त एवं प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी के निर्देशानुसार नगर निगम शहर में सड़कों व फुटपाथों के किनारे सीमेंट कंक्रीट से पेड़ों को हटाने के लिए विशेष अभियान चलाएगा। नगर निगम के इस अभियान से शहर के करीब 3100 पेड़ खुलकर सांस ले सकेंगे।नगर निगम मुख्यालय में डा. सोमवार (17) को पंजाबराव देशमुख स्मारक स्थायी समिति हॉल, नगर निगम में  आयुक्त डॉ. अध्यक्षता अभिजीत चौधरी ने की  बैठक आयोजित की गई। इस बैठक में अपर आयुक्त श्री. अजय चर्थनकर , मुख्य अभियंता श्रीमती लीना उपाध्याय, उपायुक्त श्रीमती विजया बनकर , डॉ. रंजना लाडे , श्री. विजय देशमुख , श्री. मिलिंद मेश्राम , श्री. प्रकाश वराडे , श्री. विनोद जाधव , उपायुक्त पार्क ) श्री. 

गणेश राठौड़ , अधीक्षण अभियंता श्री. मनोज तालेवार और वृक्ष प्रजनक श्री. अमोल चौरापगर उपस्थित थे। सभी दस जोनों के अधिशासी अभियंता भी उपस्थित थे। नगर निगम के उद्यान विभाग ने शहर की सड़कों और फुटपाथों के किनारे लगे पेड़ों की गणना कराई है।  यह हो गया है । इसमें शहर की 229 सड़कों पर लगे 3,100 पेड़ शामिल हैं। सबसे अधिक पेड़ नेहरू नगर क्षेत्र में हैं, जहां 21 सड़कों पर 629 पेड़ हैं। इसके बाद मंगलवार को जोन में 40 सड़कों पर 581 पेड़ हैं। इसके अलावा, धंतोली क्षेत्र में 21 सड़कों के किनारे या फुटपाथ पर 513 पेड़ स्थित हैं। 

ये पेड़ फुटपाथ पर हैं।  सीमेंट टूटने के कारण  इसमें ख़तरा है. यह सुनिश्चित करने के प्रयास किए जाएंगे कि इन पेड़ों को पर्याप्त पानी मिले और उनकी जड़ों तक अच्छी हवा पहुंचती रहे  सीमेंट कंक्रीट और सीमेंट ब्लॉकों से घिरे पेड़ों को मुक्त किया जाएगा। इससे इन पेड़ों को पानी और हवा मिलने का रास्ता साफ हो जाएगा। इस संबंध में बॉम्बे उच्च न्यायालय की नागपुर पीठ में एक जनहित याचिका दायर की गई है। शहर के वृक्षों को जीवन देने की योजना पर जोर दिया जाएगा  पेड़ों की सुरक्षा के लिए सड़क के किनारे कुछ दूरी पर सीमेंट ब्लॉक की बाड़ लगाई जाएगी। यह सुनिश्चित करने के लिए ध्यान रखा जाएगा कि पेड़ों की जड़ों को पर्याप्त मात्रा में पानी और हवा मिले  इससे पेड़ों को कोई खतरा नहीं होगा। इससे शहर के 3100 पेड़ों को जीवन मिलेगा  


इसके अलावा बैठक में वृक्षों की सुरक्षा के लिए उठाए जाने वाले कदमों पर भी चर्चा की गई । इस दौरान वृक्षों की देखभाल के विभिन्न उपायों पर चर्चा की गई। नगर निगम आयुक्त डॉ. ने शहर में अन्य संस्थाओं के अधिकार क्षेत्र में आने वाले सड़कों पर लगे पेड़ों की जानकारी भी एकत्र करने के निर्देश दिए अभिजीत चौधरी द्वारा दिया गया। इसके लिए लोक निर्माण विभाग द्वारा विशेष डिजाइन तैयार किया जाएगा। इसमें नागपुर सुधार ट्रस्ट और लोक निर्माण विभाग की सड़कें शामिल हैं।

फार्मा उद्योगात रोजगाराच्या भरपूर संधी केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी, सेंट्रल इंडिया कॉलेज ऑफ फार्मसीचा पदवीदान सोहळा

नागपूर:- फार्मा उद्योगात अनेक नवे संशोधन होत आहेत. या क्षेत्रातील शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी देखील नवीन प्रयोगांवर आणि संशोधनांवर भर देण्याची गरज आहे. नागपुरात मोठ्या प्रमाणात फार्मा उद्योग येत आहेत. अनेक कंपन्यांचे काम सुरू झाले असून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार, दि. १५ मार्च) केले. नागपूरच्या लोणारा स्थित सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या औषध निर्माण शास्त्रच्या अंतिम 
बॅचचा पदवीदान सोहळा वनामतीच्या सभागृहात आयोजित करण्यात आला. त्यावेळी ना. श्री. गडकरी बोलत होते. या कार्यक्रमाला यावेळी हिमाचल प्रदेशचे तंत्र शिक्षण मंत्री राजेश धर्माणी, मुंबईतील अंजुमन इस्लाम संस्थेचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. झहीर काझी, प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. संजीव चौधरी, माजी मंत्री अनिस अहमद आदींची प्रमुख उपस्थिती होती.नागपुरात फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज (औषध निर्माण उद्योग) वाढत आहे.




 यामध्ये फार्मसीच्या विद्यार्थ्यांची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. या विद्यार्थ्यांनी विद्वत्ता आत्मसात करण्यासोबतच उद्यमशीलतेची कास धरून नोकरी देणारे तसेच रोजगार निर्माते बनावे. विदर्भाच्या आर्थिक विकासात योगदान द्यावे,’असे 
आवाहन श्री. नितीन गडकरी यांनी केले.ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाला वाघिणीचं दूध म्हणाले होते. शिक्षणामुळे केवळ एका विद्यार्थ्याचा विकास घडून येत नाही तर त्यामागे संपूर्ण कुटुंबाचा आणि समाजाचा देखील विकास होतो. एवढे सामर्थ्य ज्ञानामध्ये आहे.कोणतीही व्यक्ती तिच्या जाती-धर्माच्या आधारावर मोठी होत नाही. तर गुणांच्या आधारावर मोठी होते. त्यामुळे मुस्लिम समाजातील तरुणांनी उच्च शिक्षण घेऊन समाजाची सेवा करावी, असे आवाहन ना. श्री. गडकरी यांनी केले.

विदर्भातील शेतकऱ्यांना दूध उत्पादन वाढविण्याची सुवर्णसंधी,केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

नागपूर:- कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पुणे या एकेका जिल्ह्यांत ७० ते ८० लाख लिटर्स दूध उत्पादन होते. विदर्भातील भंडारा व गोंदिया हे दोन जिल्हा सोडले तर उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये दूधाचे उत्पादन फार कमी होते. पण आता मदर डेअरी प्रकल्पाच्या निमित्ताने विदर्भातील शेतकऱ्यांना दूध उत्पादन वाढविण्याची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (रविवार, दि. १६ मार्च) केले.मराठवऱ्हाड दुग्ध उत्पादक संघटनेचा शुभारंभ तसेच धारा खाद्य तेल पॅकिंग केंद्राचे भूमिपूजन तसेच मदर डेअरीच्या बुटीबोरी स्थित मेगा मॅन्युफॅक्चरिंग प्लान्टच्या 
कामाचा शुभारंभ ना. श्री. गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. तेलंगखेडी मार्गावरील मदर डेअरी प्लान्ट येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी  एनडीडीबीचे अध्यक्ष डॉ. मीनेश शहा, मदर डेअरी फ्रूट्स अँड व्हेजिटेबलचे मनीष बंदलिश, नॅशनल डेअरी सर्व्हिसेसचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सी.पी. देवानंद, मराठवऱ्हाड दूग्ध उत्पादक कंपनीच्या चेअरमन वर्षा चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. ना.श्री. गडकरी म्हणाले,




 ‘मराठवाडा आणि विदर्भासाठी सुवर्णाक्षराने लिहिला जावा असा आजचा दिवस आहे. २०१६ पासून मदर डेअरीसोबत मिळून राज्य सरकार धवल क्रांती आणण्याचे आणि दूध उत्पादन वाढविण्याचे प्रयत्न करीत आहे. कारण विदर्भातील मुख्य पिकांची अवस्था वाईट आहे. वर्धा, यवतमाळ, अकोला, अमरावती, वाशीम, बुलढाणा जिल्ह्यांना शेतकरी आत्महत्यांनी ग्रासले. दुसरीकडे गडचिरोलीला नक्षल चळवळीने ग्रासल्यामुळे तेथील विकासाला खीळ बसली होती. मात्र, मदर डेअरीसोबत राज्य सरकारने सामंजस्य करार केला आणि योजना तयार केली. त्यानंतर मदर डेअरीने सुरू केलेले काम दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरत आहे.मराठवऱ्हाड दूग्ध उत्पादक संघटनेमुळे विदर्भातील महिला शेतकरी देखील आत्मनिर्भर होतील, असा विश्वास ना. श्री. गडकरी यांनी व्यक्त केला. त्याचवेळी त्यांनी विदर्भातील दूध उत्पादन वाढण्याची गरज असल्याचे म्हटले. विदर्भात हरियाणा, पंजाब, गुजरात, राजस्थानातून गायी आणल्या जात आहेत. अशाने स्थानिक शेतकऱ्यांना फायदा होणार नाही. मदर डेअरीशी जुळलेल्या ३५ हजार शेतकऱ्यांचे प्रबोधन करावे. यांच्यापैकी प्रत्येकाने पाच चांगल्या गायी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तयार केल्या तर दूध उत्पादन वाढेल. स्थानिक लोकांनी जास्त दूध देणाऱ्या गायी तयार केल्या तर त्याचा विदर्भातील शेतकऱ्यांनाच फायदा होईल,’ असेही ना. श्री. गडकरी म्हणाले. मदर डेअरीने आता पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या मदतीने येथील स्थानिक गो-पालकांच्या गायींच्या चांगल्या वाणांसाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. मदर डेअरी मार्फत पशुवैद्यकीय तज्ज्ञ एम्ब्रिओ ट्रान्सफर तसेच इन विट्रो फर्टीलायझेशन (आयव्हीएफ) सारखे आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत तसेच दुग्ध उत्पादकांपर्यंत पोहोचतील अशा रीतीने प्रयत्न करावे. यामधून जवळपास प्रतिदिन 12 ते 15 लिटर दूध देणाऱ्या गाई तयार केल्या तर महाराष्ट्राला परराज्यातील गायी येथे आणण्याची गरजपडणार नाही,’ असे ना. श्री. गडकरी यांनी यावेळी नमूद केले.शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे पशुखाद्य मिळावे यासाठी मदर डेअरीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन ना. श्री. गडकरी यांनी केले. विदर्भात कापसाची सरकी, तुर चुरी, तसेच मका मुबलक प्रमाणात आहे. यातून जिल्हानिहाय पशुधन विकसित करून ते किफायतशीर किमतीमध्ये दूध उत्पादकांना उपलब्ध करून देण्याची सूचना ना. श्री. गडकरी यांनी मदर डेअरीला केली. नेपियर ग्रासच्या माध्यमातून वर्षभर हिरवा चारा या पशुधनाला उपलब्ध करून दिल्यास दूध उत्पादनात सुद्धा वाढ होईल, असेही ते म्हणाले. मदर डेअरीच्या मार्फत नागपूर येथील सुप्रसिद्ध अशा संत्रा बर्फीचे देखील मार्केटिंग होणे आवश्यक आहे. ही बर्फी शुद्ध संत्र्याचा पल्पपासूनच तयार केली जाईल. त्यामुळे विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना देखील फायदा होईल, असा विश्वास ना. श्री. गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला.ना.श्री.गडकरी यांनी गडचिरोली आणि वाशिम या आकांक्षी जिल्ह्यांमध्ये देखील विशेष लक्ष देण्याचे आवाहन मदर डेअरीला केले.

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 63 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

 नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. सोमवार (17) रोजी शोध पथकाने 63 प्रकरणांची नोंद करून  52,000/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 29 प्रकरणांची नोंद करून 11,600/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून 300/- रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 4 प्रकरणांची नोंद करून 1,600/- रुपयांची वसुली करण्यात आली. मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींग हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालय, कॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून 6,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 22 प्रकरणांची नोंद करून 17,500/- रुपयांची वसुली करण्यात आली. वर्कशाप, गॅरेजेस व इतर दुरुस्तीचे व्यवसायीकांने रस्ता, फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 1,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 20 प्रकरणांची नोंद करून 4,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 10 प्रकरणांची नोंद करून 10,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे. जे. डी. बिल्डकॉन यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रु. 10,000/- चे दंड वसूल करण्यात आले. धंतोली झोन अंतर्गत मे. गुरु माऊली अपार्टमेंट यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रु. 10,000/- चे दंड वसूल करण्यात आले. तसेच मे. साज वूमनस फॅशन यांनी विनापरवानगी विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी असे एकुण रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आले. 











गांधी बाग झोन अंतर्गत मे. चेतेश्वर किराणा स्टोर्स यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. एम.एस. अकॅडमी यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल  5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. उपद्रव शोध पथकाने 05 प्रकरणांची नोंद करून रू. 35,000/- दंड वसूल केला.

स्वत:ची काळजी घ्या, इतरांना जागरुक करा उष्माघात प्रतिबंधक उपाययोजनांबाबत आशा सेविकांना प्रशिक्षण

नागपूर:- वाढत्या तापमानासोबतच उष्माघाताचा धोका वाढत आहे. शहरातील तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. अशा स्थितीत उष्माघात प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी होणे अत्यंत आवश्यक आहे. आशा स्वयंसेविका आरोग्य विभागाच्या महत्वाच्या दुवा आहेत. आशांनी उष्माघातापासून स्वत:चे संरक्षण करतानाच इतरांना देखील त्याबद्दल जागरुक करावे, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेच्या उष्माघात प्रतिबंधक यंत्रणेचे नोडल अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे यांनी केले.मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार शहरात उष्माघात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्या मार्गदर्शनात मनपा क्षेत्रातील सर्व आशा सेविकांना 
उष्माघात प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत प्रशिक्षित करण्यात येत आहे. त्या अंतर्गत सोमवारी (ता.१७) इंदोरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आशा सेविकांना उष्माघात प्रतिबंधक उपाययोजनांच्या अंमलबजावणी संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी मंगळवारी झोनचे झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अतीक उर रहमानजीएनएम सिल्विया सोनटक्के आदी उपस्थित होते.यावेळी आशा सेविकांना उष्माघात म्हणजे काय, त्यावर प्राथमिक उपचार काय व उष्माघात झालेल्या व्यक्तीचा जीव वाचविण्यासाठी करावयाचे उपाय तसेच उष्माघात होउ नये यासाठी करावयाच्या उपाययोजना याबाबत सविस्तर माहिती नोडल अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे यांनी दिली.खूप तापमान राहिल्यास त्याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे आपल्या शरीरावर प्रभाव पडतो. 
थेट उन्हात काम केल्यामुळे त्याचे दुष्परिणाम जाणवतात शिवाय घरात राहूनही तापमान वाढीचा आपल्या शरीरावर प्रभाव पडतो. अशा स्थितीत काळजी घेणे आवश्यक आहे. घामोळ्या येणे, पायाची नस लागणे (क्रॅम्प येणे), सुस्त वाटणे, चक्कर येउन पडणे ही साधारणत: उष्णतेमुळे दिसणारे परिणाम आहेत. पण यात सर्वांत उष्माघात हा अत्यंत धोकादायक आहे. उष्माघात झालेली व्यक्ती अचेत होउन जाते व त्याला स्वत:वर नियंत्रण करता येत नाही. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होउन जाते घाम देखील येत नाही. शरीर संपूर्ण कोरडे असताना शरीराचे तापमान प्रचंड वाढते. अशा स्थितीत अशा व्यक्तीला सावलीत नेऊन वारा घालणे, त्याच्या डोक्यावर कापड, टॉवेल ठेवून त्यावर पाणी टाकून शरीराचे तापमान थंड करण्याचा प्रयत्न व १०८ या रुग्णवाहिका सेवा क्रमांकावर फोन लावून माहिती देणे अशा बाबींची काळजी घेण्याचे आवाहन यावेळी नोडल अधिकाऱ्यांनी केले. 



मंगळवारी झोनचे झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अतीक उर रहमान यांनी आशा सेविकांनी कार्यक्षेत्रात आढळणाऱ्या बेघर व्यक्तींची माहिती देण्याचे आवाहन केले. बेघरांच्या सोयीसाठी मनपाद्वारे बेघर निवारा केंद्र सुरु करण्यात आलेले आहेत. या केंद्रांमध्ये मनपाद्वारे बेघरांचे निवासभोजनआरोग्यप्रशिक्षण या सर्व बाबींच काळजी घेत जात असल्याचेही माहिती डॉ. अतीक उर रहमान यांनी दिली. आशा सेविकांनी आपल्या कार्यक्षेत्रात जनजागृती कार्य करताना नागरिकांना ओआरएसचे पॉकीट व जनजागृती पत्रक देण्याचे देखील आवाहन डॉ. रहमान यांनी केले. प्रशिक्षणादरम्यान इंदोरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या एएनएम शीला सयामबकुळी अरमरकरलीना तागडे,  फार्मासिस्ट सोनाली सरोदे यांच्यासह मोठ्या संख्येत आशा सेविका उपस्थित होत्या. नागरिकांनी  कामाशिवाय उन्हात निघणे टाळावेउन्हात जाण्याची वेळ आल्यास योग्य खबरदारी घेतली जावी. उन्हाच्या वेळेत बाहेर फिरणे टाळावेभरपूर पाणी प्यावेस्वत:सह इतरांच्याही तब्येतीची काळजी घ्यावी,  हलकीपातळ  सच्छिद्र कपडे वापरावीतबाहेर जाताना गॉगल्सछत्री किंवा हॅटबूट किंवा चप्पलचा वापर करावाप्रवासादरम्यान पाण्याची बाटली सोबत ठेवावीउन्हात काम करताना हॅट किंवा छत्रीचा वापर करावा.  ओल्या कपड्याने डोकेमानचेहरा झाकणेशरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएसलिंबूपाणीताक आदी पेय नियमीत पिणेघर थंड  ठेवण्यासाठी ओलसर पडदेपंखाकुलर आदींचा वापर करावा.उष्माघात टाळण्यासाठी उन्हाच्या वेळेत घराबाहेर जाणेउन्हात कष्टाची कामे करणे टाळालहान मुले किंवा  पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या  पार्क केलेल्या वाहनात ठेवू नकागडदघट्ट  जाड कपडे परिधान करणे  टाळावेउन्हात स्वयंपाक करणे टाळावेस्वयंपाक करताना स्वयंपाक घराची दारे  खिक्या उघडी ठेवावीतमद्यचहाकॉफीसॉफ्टड्रिंक्स ही पेय टाळावीशिळे आणि उच्च प्रथिने असलेले अन्न खाणे टाळावे.

भारत की राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मु का गणतन्त्र दिवस पर राष्ट्र के नाम संबोधन

मेरे प्यारे देशवासियो , नमस्कार! देश और विदेश में रहने वाले , हम भारत के लोग , उत्साह के साथ , गणतन्त्र दिवस का उत्सव मनाने जा रहे हैं। मै...