Tuesday, August 20, 2024

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 70 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. मंगळवार (20) रोजी शोध  पथकाने  70 प्रकरणांची नोंद करून 40,000/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया,  स्टॉल्स,  पानठेले फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत  17  प्रकरणांची नोंद करून 6,800/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता,  फुटपाथ,  मोकळी जागा  अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून  100 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 4 प्रकरणांची नोंद करून 1600 रुपयांची वसुली करण्यात 
आली. मॉलउपहारगृहेलॉजिंगबोर्डींग हॉटेलसिनेमा हॉलमंगल कार्यालयकॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 2000 रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 20 प्रकरणांची नोंद करून 13,700/- रुपयांची वसुली करण्यात आली. चिकन सेंटर, मटन विक्रेता, यांनी त्याचा कचरा रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 1,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 14 प्रकरणांची नोंद करून 2,800/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 1प्रकरणांची नोंद करून 12,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे.सिवील डीझाईन स्टुडीयो यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रू. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. 







धंतोली झोन अंतर्ग मे. बादशाह मॅजिक वर्ल्ड यांच्या विरूध्द विनापरवानगी विद्युत खांबावर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आला. गांधीबाग झोन मे. राम किराणा शॉप यांच्यावर प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच सतरंजीपूरा झोन अंतर्गत मे. भोलेशंकर स्विट्स यांच्यावर प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. उपद्रव शोध पथकाने प्रकरणांची नोंद करून रू. 25,000/- दंड वसूल केला.

सोनी समाज ने किया ध्वजारोहण

नागपुर:-सोनी समाज मित्र मंडल की ओर से स्वाधिनता दिवस पर ध्वजारोहण गणेशपेठ स्थित मनपा के समाज भवन में हर्षोल्लास के साथ किया गयासोनी समाज मित्र मंडल के अध्यक्ष श्री सुरेश सोनीने ध्वजारोहण किया। इस अवसर पर महासचिव श्री मनीष सोनी, कोषाध्यक्ष श्री उदय सोनी, संगठन सचिव श्री संदीप सोनी, वरिष्ठ सदस्य सर्वश्री प्रकाश वर्मा, श्री राधेश्याम वर्मा, श्री कांतिलाल सोनी, एडवोकेट राधेश्याम सोनी, प्रकाश वर्मा, गोवर्धन सोनी, लक्ष्मीनारायण सोनी, प्रेमनारायण सोनी, श्रीमती पुष्पालता सोनी, श्रीमती प्रतिभा संदीप सोनी, देशकर, रणदीवे आदि उपस्थित थे। 

Saturday, August 17, 2024

कला-संस्कृतीमधून होतात व्यक्तित्वावर संस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नागपूर:- कला-संस्कृती आणि खेळांमधून मुलांच्या व्यक्तित्वावर संस्कार होत असतात. मुलांच्या व्यक्तिमत्वाला आकार देण्याच्या उद्देशाने बाल कला अकादमी आणि स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाने सुरू केलेला हा उपक्रम स्तुत्य आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) केले. बाल कला अकादमी आणि स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खासदार चषक आंतरशालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेचा समारोप झाला. रेशीमबाग येथील कवीवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित या स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्याला ना. श्री. गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ वक्ते-प्रवचनकार विवेक घळसासी, स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाचे रवींद्र फडणवीस, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष माधुरी सावरकर, बाल कला अकादमीच्या अध्यक्ष मधुरा रोडी गडकरी, अकादमीचे सचिव सुबोध आष्टीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेत एकूण ६० शाळांनी सहभाग नोंदवला. नारायणा व स्कूल अॉफ स्कॉलर्स यांनी वेगवेगळ्या गटांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. ना.श्री.गडकरी म्हणाले, ‘लहान मुलांमध्ये असलेल्या कलाकौशल्याला व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे. त्यांच्यातील कला-गुणांना वाव मिळाला तर आपला साहित्य-संस्कृतीचा वारसा जतन करणे शक्य होत असते. संगिताच्या माध्यमातून समाजात चांगला नागरिक घडविता येतो. समाजात गुणात्मक परिवर्तन करण्यासाठी संस्काराच्या माध्यमातून नवीन पिढी घडत असते.नागपूर महानगरपालिका, स्त्री शिक्षण मंडळ आणि बाल कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने कवीवर्य सुरेश भट सभागृहात लहान मुलांवर संस्कार करणारे चित्रपट दाखविण्यात यावे, अशी अपेक्षाही ना.श्री.गडकरी यांनी व्यक्त केली. विवेक घळसासी यांनी उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी प्रमोद गुजर, मंजिरी वैद्य-अय्यर व गुणवंत घटवाई या परीक्षकांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक मधुरा रोडी-गडकरी यांनी, तर सूत्रसंचालन आसावरी देशपांडे यांनी केले.

विदर्भात निर्माण व्हावे ‘काऊ फार्म्स’! केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी व्यक्त केली अपेक्षा

नागपूर:- विदर्भातील दुधाचे संकलन ५० लाख लिटर होणे आवश्यक आहे. आणि त्यासाठी २० लिटर दूध देणाऱ्या १० हजार गायी विदर्भात असणे आवश्यक आहे.चांगल्या प्रजातीच्या दुधाळू गायी शेतकऱ्यांकडे असाव्या लागतील. विदर्भात सार्वजनिक लोकसहभागातून (पीपीपी मॉडेल) काऊ फार्म्सतयार झाल्यास प्रश्न सुटू शकतो. त्यादृष्टीने तज्ज्ञांची मदत घेऊन पुढाकार घ्यायला हवा, अशी अपेक्षा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) येथे व्यक्त केली.महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठ (माफसू) येथे दुग्धव्यवसाय-उपजीविका आरोग्य आणि पोषणाचे माध्यमया विषयावर आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे ना.श्री.गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झाले.या वेळी  माफसूचे कुलगुरू डॉ.नितीन पाटील, नॅशनल डेअर डेव्हलपमेंट बोर्डाचे चेअरमन 
डॉ. मीनेश शाह, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे उपमहासंचालक (पशु विज्ञान) डॉ. राघवेंद्र बट्टा, भारतीय दुग्धव्यवसाय संघटनेचे अध्यक्ष आर.एस. सोधी आदींची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती. ना.श्री.गडकरी यांनी काऊ फार्मची संकल्पना मांडतानाच पीपीपी मॉडेल वापरण्याची सूचना केली.पीपीपी मॉडेलच्या जोरावर आज मी देशात मोठ्या प्रमाणात काम करू शकतोय. मोठे महामार्ग, रस्ते, टनेल्स होत आहेत. आपल्या देशात पैशांची कमतरता नाही. काम करणाऱ्यांची कमतरता आहे. जरा कल्पकता आणि नाविण्य वापरले, अस्तित्वात असलेल्याच पायाभूत सोयीसुविधा वापरल्या तर अधिक प्रभावीपणे काऊ फार्मचा प्रकल्प यशस्वी करता येईल, असेही ना. श्री. गडकरी म्हणाले. चांगल्या प्रजातीच्या दुधाळू गायी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे हा काऊ फार्म्सचा उद्देश असावा, असेही ते 
म्हणाले. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उत्पादन खर्च कमी करण्यावर भर देण्याची गरज आहे. त्यासाठी संशोधन करा, दुधाचे उत्पादन वाढवा आणि पशु खाद्यावरील खर्च कमी करण्याचे मार्ग शोधा, अशा सूचनाही त्यांनी केल्या. उत्पादकता वाढविणे आणि प्रक्रियेवर भर देणे या दोन गोष्टींवर भर दिला तर खूप फायदा होईल, असेही ते म्हणाले.विदर्भात मत्स्यव्यवसाय आणि दुग्धव्यवसायाच्या दृष्टीने खूप क्षमता आहे, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कृषी उत्पादन वाढवावे लागेल. एकेकाळी या देशातील ९० टक्के लोक ग्रामीण भागात राहायचे. आता २५ टक्के लोकांचे स्थलांतर झाल्यामुळे गावात राहणाऱ्यांची, शेती करणाऱ्यांची किंवा त्यासंबंधित व्यवसाय करणाऱ्यांची संख्या कमी झाली. आज देशाच्या एकूण जीडीपीमध्ये कृषी क्षेत्राचे १२ टक्के योगदान आहे. हे योगदान २५ टक्क्यांपर्यंत जाईल, तेव्हा आत्मनिर्भर भारत अभियानाला अधिक गती येईल. त्यासाठी खेडोपाडी शेतकऱ्यांपर्यंत अद्ययावत तंत्रज्ञान पोहोचवावे लागेल. उत्पादन खर्च कमी केल्याशिवाय नफा वाढणार नाही, हे समजावून सांगावे लागेल, असेही ना. श्री. गडकरी म्हणाले. 

Friday, August 9, 2024

हर घर तिरंगा’ अभियानाचा थाटात शुभारंभ मनपात अधिकारी कर्मचाऱ्यांनी घेतली “तिरंगा प्रतिज्ञा”

नागपूर:- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने केंद्र आणि राज्य शासनाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या हर घर तिरंगा’ या अभियानाचा नागपूर महानगरपालिकेमध्ये थाटात शुभारंभ झाला. अभियानांतर्गत शुक्रवारी (ता.९) नागपूर महानगरपालिकेत तिरंगा प्रतिज्ञा’ घेण्यात आली. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी उपस्थित सर्व अधिकारी आणि कर्मचा-यांना तिरंगा शपथ’ दिली.सदर अभियान देशवासीयांच्या हृदयात देशभक्तीची भावना वृदिंगात करेल तसेच राष्ट्रध्वजाप्रती अधिक सन्मान जागृत करेल. गेल्या दोन वर्षांपासून राज्यभर सुरू असलेले हे अभियान आता लोकचळवळ बनले आहे. यावर्षी देखील नागपूर शहरात मोठ्या उत्साहाने अभियान राबविण्याचा निर्धार मनपातर्फे करण्यात आला असल्याचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी सांगितले.अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चौधरी यांनी मी शपथ घेतो कीमी आपला तिरंगा ध्वज 

फडकवेलस्वातंत्र्यसैनिक व वीर हुतात्म्ये यांच्या भावनांचा सन्मान करेन आणि भारताच्या विकास व प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करेन. या आशयाची प्रतिज्ञा दिली.यावेळी अतिरिक्त आयुक्तद्वय श्रीमती आंचल गोयलश्री अजय चारठाणकरउपायुक्त सर्वश्री प्रकाश वराडेश्री. मिलिंद मेश्रामडॉ. रंजना लाडेडॉ. गजेंद्र महल्लेवैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकरसहायक आयुक्त सर्वश्री. हरिश राऊतप्रमोद वानखेडेश्याम कापसेमुख्य अग्निशमन अधिकारी बी. पीचंदनखेडेशिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयामउद्यान अधीक्षक श्री. अमोल चौरपागरक्रीडा अधिकारी डॉ. पीयूष अंबुलकरजनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.नागपूर महानगरपालिकेतर्फे ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा’ अभियान राबविले जाणार आहे. यात नागपूर शहराचाही उत्स्फूर्त सहभाग राहील. शहरात देशभक्तीपर वातावरण निर्मितीसाठी मनपा कार्यरत आहेअसे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी माध्यमांना सांगितले.हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून या कालावधीमध्ये 
तिरंगा यात्रातिरंगा रॅलीतिरंगा दौडतिरंगा कॉन्सर्टतिरंगा कॅनव्हॉसतिरंगा शपथतिरंगा सेल्फीतिरंगा मानवंदनातिरंगा मेला आदी उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांचे योग्यरित्या नियोजन करून यामध्ये विद्यार्थीनागरिकमहिला या सर्वांनाच सहभागी करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येत आहेअसे ही मनपा आयुक्तांनी सांगितले.शहरातील प्रमुख ठिकाणी सेल्फी पॉईंट उभारुन येथे नागरिकांना तिरंगा शपथ घेण्याबाबत व्यवस्था करावी. तसेच नागरिकांना अत्यंत कमी दरात कापडी तिरंगा उपलब्ध व्हावा याकरिता दहाही झोन सह प्रमुख ठिकाणी स्टॉल उभारण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले आहे.हर घर तिरंगाअभियानाच्या कालावधीमध्ये शहरातील राम झुला तसेच प्रमुख ठिकाणी तिरंगी रोषणाई करण्याचे ही निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी विभागाला दिले आहे. घर हर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून देशभक्तीचा जागर घराघरात पोहोचविला जात आहे. या अभियानामध्ये सहभागी होउन तिरंग्यासोबत सेल्फी काढून ती हर घर तिरंगा च्या संकेतस्थळावर अपलोडक करण्याचे दिशानिर्देश केंद्र शासनाद्वारे जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार सेल्फीसाठी मनपा मुख्यालयात तिरंगा ठेवण्यात आलेला आहे. मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील तळमजल्यावर मोठा तिरंगा ठेवण्यात आलेला आहे. या तिरंग्यासोबत सेल्फी काढून अधिकारी आणि कर्मचारी https://harghartiranga.com/ या संकेतस्थळावर अपलोड करीत आहेत.

ऑगस्ट क्रांती शहीद दिना निमित्त म.न.पा. द्वारा शहीदांना अभिवादन

नागपूर:- भारतीय स्वातंत्र्य लढयातील शहीदांचे प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ९ ऑगस्ट क्रांती दिना प्रित्यर्थ नागपूर महानगरपालिकेच्या वतीने डॉ. अभिजीत चौधरी आयुक्त तथा प्रशासक यांनी जुने मॉरीस कॉलेज फ्रिडम पार्क (‍झिरो माईल) जवळील हुतात्मा स्मारकास पुष्पहार व पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी नागपूर जिल्हा स्वातंत्र्य सैनिक गौरव समितीचे अध्यक्ष माजी आमदार यादवराव देवगडे, संयोजक रघुवीर देवगडे, माजी आमदार दिनानाथ पडोळे
, माजी विरोधी पक्ष नेता तानाजी वनवे, म.न.पा.चे जनसंपर्क अधिकारी मनिष सोनी आदि उपस्थित होते. तत्पूर्वी इतवारी शहीद चौक येथील शहीद स्तंभाला पुष्पचक्र अर्पण
करुन अभिवादन केले. तसेच कॉटन मार्केट शहीद चौक येथील शहीद स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली दिली. यावेळी अमोल तपासे, शैलेश जांभुळकर, सुरज पांडे आदि उपस्थित होते.जागतिक आदिवासी दिना निमित्त मनपा मुख्यालयातील क्रांतीकारी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून मनपा तर्फे विनम्र अभिवादन केले. या प्रसंगी जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे स्वप्निल लोखंडे, आयुक्त कार्यालयाचे जितेश धकाते, राजेश गजभिये, शैलेश जांभुळकर, प्रकाश ढोके, जितेंद्र पवनीकर आदी कर्मचारी उपस्थित होते.

Wednesday, August 7, 2024

नियमित टीकाकरण पर टास्क फोर्स समिति की बैठक - मच्छर जनित बीमारियों पर नियंत्रण के उपायों पर चर्चा

 नागपुर :- नागपुर नगर निगम के माध्यम से शहर में नगर अस्पताल , सरकारी एवं निजी अस्पतालों में नियमित टीकाकरण एवं मलेरिया , डेंगू, चिकनगुनिया जैसी मच्छर जनित बीमारियों पर नियंत्रण के उपाय चलो भी इस संबंध में अपर आयुक्त श्रीमती आंचल गोयल की अध्यक्षता में मंगलवार ( 06 बजे ) काम बल समिति की बैठक हुई.मनपा मुख्यालय पर अपर आयुक्त सभाकक्ष में हुई बैठक में मनपा के चिकित्सा स्वास्थ्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर , अतिरिक्त चिकित्सा स्वास्थ्य अधिकारी डॉ. विजय जोशी ,  प्रजनन एवं बाल कल्याण अधिकारी डॉ. सरला लाड , विश्व स्वास्थ्य संगठन के चिकित्सा अधिकारी डॉ. मोहम्मद साजिद , महामारी अधिकारी डॉ
गोवर्धन नवखरे , हाथी रोग अधिकारी डॉ मंजूषा मठाधीश , सीपीएम अश्विनी निकम क्षेत्रीय चिकित्सा स्वास्थ्य अधिकारी डॉ. दीपांकर भिवगड़े , डॉ. सुनील कांबले , डॉ. जयश्री चन्ने , डॉ. गजानन पवने , डॉ. अतीक खान , डॉ.ख्वाजा मोइनुद्दीन , डॉ. विजयकुमार तिवारी , डॉ. सुलभा शेंडे , डॉ. वर्षा देवस्थले , डॉ.मालखंडेल , डॉ.शीतल वांडिले टीकाकरण क्षेत्र नियंत्रक , आशा सेविका एवं अन्य प्रतिनिधि मुख्य रूप से उपस्थित थे। बैठक में अपर आयुक्त श्रीमती आंचल गोयल ने मलेरियाडेंगू , चिकनगुनिया जैसी मच्छर जनित 
बीमारियों पर नियंत्रण के उपायों पर चर्चा की। साथ ही कुल कितने क्षेत्र में फॉगिंग और उन्होंने समीक्षा की कि छिड़काव किया गया है. जोन के हिसाब से मशीन कितनी है और मच्छरों के प्रजनन को रोकने के लिए भी फॉगिंग और जो स्प्रे करते हैं शेड्यूल में बदलाव करके हर जोन के हिसाब से फॉगिंग तथा नियमित छिड़काव करें करने के निर्देश जोनल अधिकारियों को दिया गया। इसी तरह उन्होंने 
अस्पताल में नियमित टीकाकरण की भी समीक्षा की. उच्च जोखिम वाले क्षेत्रों में सरकारी अभियान चलाया जाएगा और वंचित बच्चों की सूची तैयार कर उनका टीकाकरण किया जाएगा। जिन क्षेत्रों में टीकाकरण की दर कम है, वहां नागरिकों में टीकाकरण के बारे में जागरूकता पैदा की जानी चाहिए , नागरिकों को आवश्यकता के अनुसार परामर्श दिया जाना चाहिए , संबंधित अधिकारियों, जोनल अधिकारियों को टीकाकरण बढ़ाने के लिए यूपीएचसी स्तर पर आंगनवाड़ी कार्यकर्ताओं, आशा एएनएम आदि का उचित मार्गदर्शन करना चाहिए। अधिकारी आशा एवं एएनएम के रजिस्टर की नियमित जांच करें , ऐसे निर्देश बैठक में श्रीमती गोयल ने दिये. इसके अलावा श्रीमती गोयल ने यह भी निर्देश दिये कि बच्चों के टीकाकरण में महिला स्वास्थ्य समिति के सदस्यों की भागीदारी बढ़ाने के लिये नियमित बैठक आयोजित की जाये। बैठक में प्रजनन एवं शिशु कल्याण अधिकारी डॉ.सरला लाड ने पिछले माह टीकाकरण से वंचित एवं देर से टीकाकरण की जानकारी दी। विश्व स्वास्थ्य संगठन के चिकित्सा अधिकारी डॉ. मोहम्मद साजिद ने कम्प्यूटरीकृत प्रेजेंटेशन के माध्यम से नियमित टीकाकरण का सिंहावलोकन प्रस्तुत किया।
 

मनपाद्वारे दोन लाखावर अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात मंजुरीसाठी सुपूर्द मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : मनपा मुख्यालयात विशेष कक्ष स्थापित

 नागपूर:- महाराष्ट्र शासनाची महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज स्वीकृती बाबत नागपूर महानगरपालिकेने एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. लाभार्थी महिलांनी भरलेल्या अर्जाच्या नमुन्याची  तपासणी करून दोन लाखांपेक्षा जास्त अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात मंजुरीसाठी सुपूर्द करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे आठवड्याभरातच मनपाने हा दोन लाख अर्जांचा आकडा गाठला आहे.मुख्यमंत्री  माझी  लाडकी बहीण योजनेद्वारे 2.5 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या परिवारातील महिलांना प्रतिमाह 1500 रुपये आर्थिक सहकार्य मिळणार आहे. नागपूर शहरातील जास्तीत जास्त महिलांना योजनेचा लाभ मिळावा, त्यांच्या अर्जाची योग्य तपासणी व्हावी याकरिता नागपूर महानगरपालिकेने विशेष पुढाकार घेतला. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आलेल्या प्रक्रियेतील हे महत्वपूर्ण यश असून यासाठी मनपा आयुक्तांनी अर्जाच्या नमुन्याची तपासणी करणारे 280 पेक्षा अधिक संगणक मॅनेजर तसेच समाज विकास विभागाचे अधिकारी आणि माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.मनपा 
आयुक्त यांच्या निर्देशनानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची तपासणी करण्यासाठी नागपूर महानगरपालिका मुख्यालयामध्ये विशेष कक्ष स्थापित करण्यात आले आहे. या कक्षामध्ये 100 पेक्षा अधिक संगणक उपकरणांची व्यवस्था करण्यात आली. यावर तीन शिफ्टमध्ये सुमारे 280 संगणक मॅनेजर नियुक्त करण्यात आले. या संगणक मॅनेजरकडून अर्जाची तपासणी करून ते मंजुरीसाठी पाठविण्यात येत आहे. मनपाचे संगणक मॅनेजर या प्रक्रियेसाठी अहोरात्र काम करीत असून त्यांच्या परिश्रमामुळेच मनपाने महत्वाचा टप्पा गाठला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्याकरिता राज्य सरकारकडून नेहमी आवाहन करण्यात येत आहे. राज्य शासनाच्या आवाहनाला उदंड प्रतिसाद देत महिलांनी मोठ्या संख्येत या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अर्ज मनपाचे झोनल कार्यालय तसेच प्रभाग स्तरावरील जमा केले. 


अर्ज स्वीकार करून त्याची योग्य तपासणी करण्यासाठी मनपाद्वारे तीन शिफ्टमध्ये संगणक मॅनेजरची नियुक्ती करण्यात आली. याशिवाय सिव्हिल लाईन्स येथील मनपा मुख्यालयात 4 ठिकाणी विशेष कक्ष तयार करण्यात आले व येथे देखील वेगवेगळ्या शिफ्टमध्ये कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. त्याचाच परिणाम मनपाकडे प्राप्त झालेल्या अर्जाची तपासणी करून 2,12,778 अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर येथे पुढील कार्यवाही करिता पाठविण्यात आले.  मनपाला प्राप्त अर्जांमधून 181 अर्ज रद्द करण्यात आले. तसेच 5898 आंशिक रद्द करण्यात आले. केवळ 2589 अर्जाचा सध्या प्रक्रिया करण्यात येत आहे.




मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी या महत्वपूर्ण टप्प्याकरिता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरणे आणि तपासणी प्रक्रियेमध्ये सहभागी संगणक मॅनेजर आणि कर्मचारी या सर्वांचे विशेष अभिनंदन केले आहे. या सर्वांनी समन्वयाने केलेल्या कार्याचे मोठे फलीत मिळालेले आहे. शहरातील कुणीही लाभार्थी महिला या योजनेपासून वंचित राहता कामा नये. यासाठी मनपाद्वारे विशेष लक्ष देण्यात येत आहे. लाभार्थी महिलांना स्वत: देखील ऑनलाईन अर्ज भरण्याची सोय आहे. याशिवाय मनपातील झोनल कार्यालय तसेच प्रभाग कार्यालयांमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज भरण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ऑफलाईन आलेले अर्ज मनपाचे संगणक मॅनेजर ऑनलाईन माध्यमातून भरून घेतात. अर्ज तपासणीमध्ये ज्या अर्जांमध्ये कागदपत्रांची पूर्तता नसेल किंवा काही त्रुटी असेल तर ते तात्पुरते रद्द ठरविण्यात आले आहेत. लाभार्थी महिलांना संबंधित कागदपत्रांची पूर्तता करून पुन्हा अर्ज सादर करता येणार आहे. योजनेसाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2024 असून मोठ्या संख्येत महिलांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन देखील मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.मनपाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांच्या मार्गदर्शनात हे कार्य पूर्ण झाले. माहिती व तंत्रज्ञान विभागाचे कमलेश झंझाड, स्वप्निल लोखंडे, प्रणय जयस्वाल, रवींद्र किदंर्ले, सिद्धार्थ झोडापे यांनी यामध्ये यशस्वी योगदान दिले. योजनेसाठी आधार कार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) ते नसल्यास महिलेचे 15 वर्षांपूर्वीचे रेशनकार्ड किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र (Leaving Certificate) किंवा जन्म दाखला (Birth certificate) किंवा मतदार ओळखपत्र (Voter ID Card), परराज्यात जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर पतीचा जन्म दाखला किंवा पतीचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) यापैकी कुठलेही एक कागदपत्र सादर करावे. याशिवाय उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापर्यंत) नसल्यास पिवळे रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड, बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत. (आधार कार्ड सोबत लिंक असावे.) हमीपत्र ही कागदपत्रे आवश्यक आहेत.विशेष म्हणजे, श्रावणबाळ,संजय गांधी निराधार तसेच इतर शासकीय आर्थिक योजना ज्या योजने-अंतर्गत रु. 1500 लाभ प्राप्त महिला सदर योजनेचा लाभ घेण्यास अपात्र असणार आहेत तर त्याची नोंद महिलांनी घ्यावी.

हातमाग उत्पादनांच्या मार्केटिंग करिता पुढाकार घेणे आवश्यक - खादी आणि ग्रामोद्योग महामंडळाचे केंद्रीय सदस्य जयप्रकाश गुप्ता

नागपूर:- हातमागाच्या उत्पादनांना गत वैभव मिळवून देण्यासाठी त्यांच्या मार्केटिंग करिता पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या खादी आणि ग्रामोद्योग महामंडळाचे केंद्रीय सदस्य जयप्रकाश गुप्ता यांनी आज केले . केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत नागपूरच्या नवीन सचिवालय भवन,सिवील लाइन्स स्थित  विणकर सेवा केंद्र, नागपूर द्वारे आज 7 ऑगस्ट रोजी 10 वा राष्ट्रीय हातमाग   दिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.यावेळी केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्रालयातील विशेष कार्यकारी अधिकारी सुधीर दिवे,  विणकर सेवा केंद्राचे उपसंचालक संदीप ठुबरीकर, सहायक संचालक महादेव पवनीकर  प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी विणकर सेवा केंद्र नागपूर कार्यालयाचे उपसंचालक 
संदीप ठुबरीकर यांनी सांगितले की, हातमागाचे कापड हे पर्यावरण दृष्ट्या शाश्वत असते आणि याच्या निर्मितीसाठी विजेची गरज लागत नाही.नागपूरच्या तांडापेठ , धापेवाडा  आणि अकोला येथील बाळापूर येथे 3 हातमाग क्लस्टरची निर्मिती करण्यात आली असून या मार्फत हातमागचे उत्पादन चालू आहे अशी माहिती त्यांनी दिली.शेतीनंतर सर्वात जास्त रोजगार देणारे क्षेत्र हे विणकाम क्षेत्र होते परंतु आता हा विणकाम व्यवसाय लुप्तप्राय  होण्याच्या मार्गावर होण्याची चिन्ह दिसत आहे . यासाठी या क्षेत्रामध्ये नवीन संशोधनाशी  विणकारांनी अद्यावत राहावे असा आवाहन सुधीर दिवे यांनी केले . 
विणकर  सेवा  केंद्राचे सहाय्यक संचालक महादेव पवनीकर यांनी विणकरांसाठी केंद्र शासनाद्वारे उपलब्ध असलेल्या असणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.यामध्ये विणकरांसाठी 'समर्थ' प्रशिक्षण, हातमाग यंत्र खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य,विणकरांना तांत्रिक सहाय्य करण्यासाठी  'बुनकर मित्र'  या टोल फ्री हेल्पलाइनची  सुविधा,हातमाग वस्तूच्या विक्रीसाठी दिल्ली हाट तसेच राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय प्रदर्शनाची उपलब्धता,विणकरांसाठी वैद्यकीय सुविधा आणि विमा सुविधा या योजनांचा समावेश होता. या कार्यक्रमाप्रसंगी हातमाग वस्तूंचे प्रदर्शन देखील भरवण्यात आले तसेच  केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग मंत्रालयातर्फे हातमाग क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार प्राप्त  विणकारांचा सत्कार करण्यात आला .या कार्यक्रमाला हातमाग विणकर, हातमाग निर्यातदार, उद्योजक, हातमाग व्यावसायिक आणि विणकर सेवा केंद्राचे अधिकारी , कर्मचारी उपस्थित होते.   
 
 

सप्ताह में एक दिन "शुष्क दिवस" ​​मनाया जाए - बुखार रोगी सर्वेक्षण में आशा वालंटियर्स को सहयोग देने की अपील - आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी

[Demo Pick]
नागपुर :- मानसून शुरू होने के बाद मच्छरों का प्रकोप बड़ी संख्या में बढ़ जाता है. इसके कारण डेंगू और चिकनगुनिया जैसी जानलेवा बीमारियाँ पनपती हैं। डेंगू और चिकनगुनिया पर नियंत्रण के लिए स्वास्थ्य विभाग तैयार नगर निगम आयुक्त एवं प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी ने किया. नागपुर शहर में डेंगू और चिकनगुनिया के प्रसार को रोकने के लिए नागपुर नगर निगम का स्वास्थ्य विभाग तैयार है। स्वास्थ्य विभाग की ओर से शहर में बुखार के मरीजों का सर्वे शुरू कर दिया गया है। आशा स्वयंसेवक द्वारा जोनवार सर्वेक्षण कराया जा रहा है। इस सर्वे में आशा स्वयंसेविकाएं घर-घर जाकर बुखार के मरीजों की जानकारी जुटा रही हैं। आयुक्त एवं प्रशासक डॉ. ने 
[DemoPick]
नागरिकों से सर्वेक्षण के दौरान उचित जानकारी देकर सर्वेक्षण कार्य में सहयोग करने की भी अपील की। अभिजीत चौधरी ने किया। नगर पालिका क्षेत्र के अनुसार आशा स्वयंसेविकाओं द्वारा चल रहे सर्वेक्षण अभियान में अब तक 162895 घरों का सर्वेक्षण किया जा चुका है। लगातार बढ़ती बारिश से कीट रोगों का प्रकोप बढ़ रहा है। जहां ऐसी बीमारियां मौजूद हैं, वहां समय पर आवश्यक उपाय करने के लिए आशा स्वयंसेवकों द्वारा सर्वेक्षण किया जा रहा है। इस सर्वे में आशा स्वयंसेविकाएं घर-घर जाकर बुखार के मरीजों की जानकारी जुटा रही हैं। इसके अलावा कंटेनर सर्वे के तहत घर और क्षेत्र में पानी जमा करने वाली वस्तुओं का निरीक्षण किया जा रहा है. 
[आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी]





बुधवार 7 अगस्त तक सभी दस जोन में 162895 घरों का सर्वेक्षण किया गया। इन घरों में 4369 दूषित बर्तन मिले। 6278 कूलर 1112 टायर , 5290 गमले , 2889 ड्रम , 1240 गमले , 894 पक्षी और पशु कंटेनर और 1745 अन्य कंटेनर में डेंगू के लार्वा पाए गए। जहां लार्वा मिला वहां दवा लगाई गई। नागरिकों को घर और क्षेत्र में डेंगू मच्छरों के प्रजनन को रोकने के लिए स्वच्छता का विशेष ध्यान रखना चाहिए। चूंकि डेंगू का लार्वा पानी में बढ़ता है, इसलिए इस बात का ध्यान रखना चाहिए कि कहीं भी पानी जमा न हो। कूलर और गमलों का पानी रोजाना बदलें। इसके अलावा डॉक्टर ने बुखार होने पर तत्काल चिकित्सीय सलाह लेने का भी आग्रह किया।

भारत की राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मु का गणतन्त्र दिवस पर राष्ट्र के नाम संबोधन

मेरे प्यारे देशवासियो , नमस्कार! देश और विदेश में रहने वाले , हम भारत के लोग , उत्साह के साथ , गणतन्त्र दिवस का उत्सव मनाने जा रहे हैं। मै...