Thursday, January 30, 2025

संविधानावर आधारित चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती दहाही झोनमध्ये अभियानाला उदंड प्रतिसाद

नागपूर -: भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त समाजकल्याण विभाग नागपूर यांचेद्वारे तयार करण्यात आलेल्या भारतीय संविधानावर आधारित चित्ररथाच्या माध्यमातून नागपूर महानगरपालिकेद्वारे संपूर्ण शहरात जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हिरवा झेंडा दाखवून चित्ररथाचा शुभारंभ केलामनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त श्रीमती सुकेशिनी तेलगोटे यांच्या नेतृत्तवात या चित्ररथाच्या माध्यमातून दहाही झोनमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.भारतीय संविधानाबाबत जागरुकता तसेच घटनात्मक अधिकार व कर्तव्यांबद्दल सर्व नागरिकांमध्ये जागरूकता वाढविण्यासाठी संविधान अमृत महोत्सवाची नागपूर शहरात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी समाजकल्याण विभाग नागपूर यांचेद्वारे संविधान चित्ररथ तयार करण्यात आले असून त्या माध्यमातून २७ जानेवारीपासून दररोज शहराच्या विविध भागात मनपा झोननिहाय जनजागृती केली जात 
आहे. याच श्रृंखलेत गुरुवारी (ता३०सकाळी १० ते १२ दरम्यान सतरंजीपुरा व सायंकाळी ४ ते ६ या वेळेत लकडगंज झोन येथे हे अभियान राबविण्यात आले.स्वातंत्राच्या अमृत महोत्सवानिमित्त २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी समाजकल्याण विभाग नागपूर यांचेद्वारे भारतीय संविधानावर आधारित आकर्षक चित्ररथ तयार करण्यात आले होतेत्याच चित्ररथाच्या माध्यमातून मनपातर्फे २७ जानेवारीपासून शहराच्या विविध भागात जनजागृती अभियान राबवण्यात येत आहेआतापर्यंत लक्ष्मीनगरधरमपेठहनुमाननगरधंतोलीनेहरू नगर व गांधाबाग या झोनमध्ये जानजागृती अभियान रावण्यात आले आहे३० रोजी सतरंजीपुरा झोन अंतर्गत येत असलेल्या विट भट्टीपारडी उड्डाण पूलऑटोमोटिव्ह चौक येथे सकाळी १० ते १२ दरम्यान चित्र रथ फिरवून जनजागृती करण्यात आलीतसेच सायंकाळी ४ ते ६ वाजता दरम्यान लकडगंज झोन अंतर्गत कच्छी विसा मैदानात जनजागृती अभियान राबवण्यात आले.

खासदार भजन स्पर्धेची महाअंतिम फेरी २ फेब्रुवारीला,केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण

नागपूर:- केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आयोजित खासदार भजन स्पर्धेची महाअंतिम फेरी रविवार दि. २ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ८ ते ११ या वेळेत कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग येथे आयोजित करण्यात आली आहे.महाअंतिम फेरीचा पुरस्कार वितरण सोहळा सकाळी ११.३० वाजता होईल. केंद्रीय मंत्री ना. श्री नितीन गडकरी यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजप शहर अध्यक्ष बंटी कुकडे, आमदार प्रवीण दटके, आमदार मोहन मते, आमदार कृष्णा खोपडे, खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष अनिल सोले, सचिव जयप्रकाशजी गुप्ता, महिला आघाडी अध्यक्ष प्रगती पाटील आदींची प्रमुख उपस्थिती असेल.७ ते १२ जानेवारी दरम्यान घेण्यात आलेल्या प्राथमिक फेरी स्पर्धेत नागपुरातील ६ विभागांतील ५८३ भजनी मंडळांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. सर्व भजनी मंडळींद्वारे श्रीकृष्ण भक्तीचा जागर 
करण्यात आला. या स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत विजेत्यांना २० भव्य रोख पारितोषिक देण्यात येईल. ज्येष्ठ वयोगटात १२ पुरस्कार आहेत. सात रोख पुरस्कार आणि पाच उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात येतील. खासदार भजन स्पर्धेत नागपुरातील सहभागी ५८३ भजनी मंडळांना प्रत्येकी १५००/- रुपये मानधन आणि प्रमाणपत्र देण्यात येईल.भजन स्पर्धेचे संयोजन डॉ. श्रीरंग वराडपांडे यांनी केले आहे. खासदार  भजन स्पर्धेच्या यशस्वितेसाठी अमोल ठाकरे, विश्वनाथ कुंभलकर, माया हाडे, सपना सागुळले, श्वेता निकम, श्रधा पाठक, रेखा निमजे, विजय येरणे, दर्शना नखाते, सुजाता कथोटे, अभिजित कठाले, श्री. ढबले, अतुल सगुळले आदी पदाधिकारी परीश्रम घेत आहेत.

हुतात्मांना मनपा तर्फे विनम्र अभिवादन

नागपूर :भारताच्या स्वातंत्र्याकरीता असंख्य देशभक्तांची प्राणार्पंण केले अशा हुतात्मा देशभक्तांचे स्मरण करुन तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त दोन मिनिट मौन पाळून हुतात्मा  दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे अभिवादन करण्यात आले. मनपा मुख्यालयामध्ये महात्मा गांधी यांच्या तैलचित्राला तसेच थोर हुतात्म्यांच्या तैलचित्राला पुष्प अर्पण करुन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी अभिवादन केले. याप्रसंगी उपायुक्त श्रीमती विजया बनकरसहायक आयुक्त श्री. श्याम कापसेमुख्य अग्निशमन अधिकारी श्री. बी.पी.चंदनखेडेवैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकरसहायक संचालक नगर 
रचना श्री. ऋतुराज जाधवजनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनीसहायक अधीक्षक श्री. राजकुमार मेश्राम आदी उपस्थित होते. शहरात विविध ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला देखील मनपाद्वारे पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले आणि गांधीसागर बालोद्यान येथील हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली. जनसंपर्क विभागाचे अमोल तपासेश्री शैलेश जांभुळकरमाजी नगरसेवक श्री. मनोज साबळे श्री. राजेश कुंभलकर, डॉ. पांडे यांच्यासह पोलिस आणि अग्निशमक दलाचे जवान यांनी हुतात्मांच्या स्मृतींना अभिवादन केले.

अमृतकाल:विकसीत भारत – 2047’ फिन-लिट-टेक’ सम्मेलन की मेजबानी करेगा “मनी बी”

नागपुर:- वित्तीय प्रशिक्षण प्रदाता मनी बी इंस्टीट्यूट प्राइवेट लिमिटेड 1, 2 और 8 फरवरी को अमृतकाल: विकसित भारत – 2047’ शीर्षक से तीन दिवसीय निवेशक प्रशिक्षण सम्मेलन अर्थात फिन-लिट-टेककॉनक्लेव का आयोजन कर रहा है। यह सम्मेलन पिछले 3 वर्षों से आयोजित किया जा रहा है, जिसमें नीति निर्माता और उद्योग के दिग्गज, छोटे निवेशकों को निवेश के अवसरों और नुकसानों के बारे में मार्गदर्शन देते हैं। देश अमृतकाल से अपने भविष्य की ओर बढ़ता है, निवेश के अवसर भी बढ रहे है । उन अवसरों और नुकसानों पर भी इस कॉनक्‍लेव में मार्गदर्शन किया जाएगा।  इस वर्ष के सम्मेलन का उद्घाटन शनिवार, 1 फरवरी, 2025 को शाम 6:30 बजे साइंटिफिक सोसाइटी लॉन, लक्ष्मी नगर में महाराष्ट्र के मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फड़नवीस द्वारा किया जाएगा। इस 
कार्यक्रम में केडिया सिक्योरिटीज के प्रबंध निदेशक विजय केडिया और एनएसई के मुख्य बिजनेस डेवलपमेंट मैनेजर श्रीराम कृष्णन भाग लेंगे। रविवार, 2 फरवरी, 2025 को शाम 6:30 बजे, भारत सरकार के केंद्रीय वाणिज्य और उद्योग मंत्री पीयूष गोयल, मॉर्गन स्टेनली इंडिया के प्रबंध निदेशक रिधम देसाई और वेंचर कैटालिस्ट ग्रुप के सह-संस्थापक अपूर्व शर्मा उपस्थित रहेंगे। इस अवसर पर भारतीय अर्थव्यवस्था, निवेश, शेयर बाजार और धन सृजन जैसे विषयों पर मार्गदर्शन प्रदान किया जाएगा। सम्मेलन का समापन शनिवार, 8 फरवरी को शाम 6.30 बजे केंद्रीय मंत्री माननीय श्री नितिन गडकरी द्वारा किया जाएगा। इस समारोह में उद्योगपति रमेश दमानी भी उपस्थित रहेंगे। यह जानकारी पत्रकार परिषद में उपस्‍थ‍ित मनी बी की संचालिका शिवानी दाणी-वखरे द्वारा दी गई। इस समय आशुतोष वखरे और शैलेश सांडेल भी उपस्‍थ‍ित थे।

Wednesday, January 29, 2025

विद्यार्थी परिषद तुमचे व्यक्तिमत्व घडविणार आहे केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी; अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ५३वे विदर्भ प्रांत अधिवेशन

नागपूर:- आजचा नागरिक कसा असावा, त्याला उत्तम नागरिक म्हणून कसे घडविले पाहिजे, याला व्यक्तिनिर्माण म्हणतात. हेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सांगितले जाते. आपण कार्यकर्त्याला गुणदोषांसह स्विकारत असतो. कारण कुणीही परफेक्ट नाही. आपण सगळे अपुर्णांक आहोत. आपण विद्यार्थी जीवनात विद्यार्थी परिषदेत काम करताना आपले व्यक्तिमत्व कसे घडविले जाणार आहे, याचे चिंतन करण्याची गरज आहे. कारण विद्यार्थी परिषद तुमचे व्यक्तिमत्व घडविणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (मंगळवार) केले.अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ५३व्या विदर्भ प्रांत अधिवेशनाला रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात सुरुवात झाली. अधिवेशनातील रिअल लाईफ रोल मॉडेलया सत्रात ना. श्री. 
गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी प्रांत अध्यक्ष श्रीकांत परबसन, सुनील गौरदीपे, मोहिनी हेडाऊ, प्रशांत कुकडे आदींची उपस्थिती होती. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संस्थापक स्व. दत्ताजी डिडोळकर यांच्या जीवनचरित्रावर संबंधित व्हिडिओचे लोकार्पण ना. श्री. गडकरी यांच्या हस्ते झाले.ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘ज्ञान चरित्र एकतायही हमारी विशेषता, हे आपल्याला विद्यार्थी परिषदेत शिकायला मिळते. मी विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता होतो. विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षण संस्था या सर्वांचा एक शैक्षणिक परिवार असावा, अशी परिषदेची संकल्पना आहे. 
विद्यार्थ्यांचे कर्तृत्व कसे घडवता येईल, यादृष्टीने संस्कार करणारी एक संघटना म्हणून परिषदेचा लौकीक आहे. आजचा विद्यार्थी हा उद्याचा नव्हे तर आजचा नागरिक आहे.विद्यार्थी परिषदेत प्रत्येक जण काहीतरी शिकलेला आहे. मी व्यक्तिगतरित्या काम सुरू केले, तेव्हा माझी रुची महाविद्यालयीन निवडणुकांमध्ये होती. पण मला इतरही अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. घाईने राजकारणात जायला नको, याची शिकवणही मिळाली. उत्तम प्रशिक्षण, संस्कार झाल्याशिवाय राजकारणात जायला नको, हे मदनदासजींनी सांगितले. पाच वर्षे उत्तम काम करायचे आणि त्यानंतर राजकारणात जायचे, असे त्यांनी मला सांगितले होते. मला राजकारणात यायची घाई नव्हती. पण त्यांच्या उपदेशांचा मला फायदा झाला,’ असेही ना. श्री. गडकरी म्हणाले.संघटनात्मक कार्य, रचनात्मक कार्य आणि आंदोलनात्मक कार्य, या तीन गोष्टींचा विद्यार्थी परिषदेत वारंवार उल्लेख होतो. चलो जलाए दीप वहाँ जहाँ अभी भी अंधेरा है’, हा आपला मुख्य उद्देश आहे. वंचितांचे आयुष्य बदलविण्याचे काम कसे करता येईल, याचा विचार करणे आपले काम आहे. समाजोपयोगी काम करण्यावर भर देण्याची गरज आहे. जिथे समस्या आहेत, जिथे अज्ञान आहे, तेथील लोकांचे सामाजिक, आर्थिक जीवन बदलविण्याचे काम आपले आहे. सामाजिक संवेदनशीलता आपल्या कामातून व्यक्त होत असते, असेही ना. श्री. गडकरी म्हणाले.

मनपाच्या ‘पुष्पोत्सव २०२५’ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या उद्यान विभागाद्वारे शहरातील विविध उद्यानात आयोजित करण्यात आलेल्या ‘पुष्पोत्सव २०२५ ’ प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या नेतृवात उद्यान विभागाद्वारे शहरातील प्रमुख १५ उद्यानामध्ये 'पुष्पोत्सव २०२५'चे २५ जानेवारी ते २ फेब्रुवारी पर्यंत आयोजन करण्यात आले आहे.शहरातील १५ उद्यानांमध्ये आलेल्या नागरिकांनी ‘पुष्पोत्सव’ प्रदर्शनाला भेट देत निरनिराळ्या वनस्पतीची माहिती जाणून घेतली. नागरिकांनी मध्य भारतात आढळणाऱ्या देशी झाडांचे विविध उपयोग जाणून घेतले. रस्त्याच्या कडेला लावण्यासाठी झाडेआर्टिफिशियल फुले आदीसह निरनिराळ्या प्रकारचे शोभिवंत फुलेआकर्षक 
पुष्परचनाआकर्षक रोषणाईची सुविधा महानगरपालिका उद्यानात उपलब्ध करुन दिल्याने मनमोहक ‘पुष्पोत्सव’ प्रदर्शनाला बघून नागरिकांनी आनंद व्यक्त केला.१५ विविध उद्यानांमधील पुष्प प्रदर्शनातील आकर्षक व मोहक फुले पाहण्यात लहान-थोर मंडळी गढून गेल्याचे दिसून येत होते. मनमोहक फुलांची छबी आपल्या मोबाईलमध्ये लहानवृद्धयुवक युवती टिपताना दिसत होतेचत्यासोबत आकर्षक वेगवेगळ्या फुल्यांच्या सानिध्यात आणि सेल्फी पॉइंटवर सेल्फी घेण्याचा मोह सगळ्यांनाच अनावर होताना दिसत होते. सेल्फीसाठी पुष्प प्रदर्शनातील प्रत्येक ठिकाणी लाईन लागली होती . 



तर फुलांनी सजलेल्या लव आर्च वर नागरिकांनी छायाचित्र काढले.  राजीव गांधी उद्यानत्रिमूर्ती नगरमेजर  सुरेंद्र देव पार्क धंतोलीलता मंगेशकर उद्यानदेशपांडे लेआऊट येथील स्वातंत्र सुवर्ण जयंती उद्यानशंकर नगर उद्यानभारतमाता उद्यानत्रिशताब्दी उद्याननंदनवनमहात्मा फुले उद्यानसुयोग नगरमहात्मा गांधी उद्यान हनुमान नगरतुलसी नगर उद्यानशांतीनगरपाटणकर चौक उद्यानॲड. सखारामपंत मेश्राम उद्यानात पुष्पोत्सव प्रदर्शनामध्ये १०० हून अधिक सीजनल व पेरॅनियल फुलांचे प्रकार व विभिन्न प्रजातींची फुलेऔषधी वनस्पतीची झाडे विविध ठिकाणी प्रत्यक्ष पहायला मिळतं आहेत. नागरिकांनी 'पुष्पोत्सव २०२५’ ला भेट द्यावीअसे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.पुष्पोत्सव २५ जानेवारी पासून ते २ फेब्रुवारीपर्यंत सर्व




नागरीकांसाठी सकाळी ५.००ते १०.०० तर सायंकाळी ४ ते  रात्री ९ वाजेपर्यंत उपलब्ध राहणार आहे. "पुष्पोत्सवाचे आयोजन करून नागपूर 
महानगरपालिकेतर्फेखूप छान असा पुढाकार घेण्यात आला आहे. जे कुठल्याही उद्यानात दिसत नाही. अशाप्रकारे उद्यानाचा विकास केला तर नागरिकांना त्याचा लाभ अधिक घेता येऊ शकतो."राहुल सावदे:- "नागपूर महानगरपालिकेतर्फे' 'पुष्पोत्सवाचे आयोजन केल्याने नागरिकांना लाभ मिळेल. तरी उद्यानामधील फुलांचे सातत्याने देखभाल करणे आवश्यक आहे."डॉ. माधुरी ठाकरे:- "पुष्पोत्सव खूप छान असे उपक्रम मनपातर्फे राबविण्यात आला आहे. शहरातील प्रत्येक उद्यानात असे उपक्रम राबविले  तर मुलांना पर्यावरणाशी जोडता येईल आणि लहान मुलांना अशा पुष्पोत्सवामध्ये आणून त्यांना अधिक माहिती देता येईल. प्रत्येकाने एक तरी झाड लावावे हा संदेश देता येईल.’’मानसी बोदेले:- "लोकांना निसर्गाच्या सानिध्यात आणण्यासाठी नागपूर महानगरपालिकेचा पुष्पोत्सव चांगला उपक्रम आहे. अशामुळे मनप्रसन्न होते. महापालिकेने योग्य लक्ष देण्याबरोबर नागरिकांनी उद्यान स्वच्छ ठेवण्यास मदत करायला हवे.
 

मेयो रुग्णायालयातील पुरातन वृक्षांचे जतन आणि संवर्धन करा : आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी

नागपूर :- नागपूर महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय (मेयो हॉस्पिटल) येथे प्रस्तावित अंतर्गत रस्त्याचे बांधकाम आणि क्रीडा मैदानाच्या विकासादरम्यान प्रस्तावित वृक्ष तोडण्याबाबत परवानगी प्रस्तावाच्या अनुषंगाने बुधवारी (ता. २९) पाहणी केली. यावेळी त्यांनी मेयो हॉस्पिटल  परिसरातील पुरातन वृक्षांचे जतन आणि संवर्धन करण्याचे निर्देश दिले.याप्रसंगी मेयो हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण, मनपा उपायुक्त (उद्यान) श्री. गणेश राठोड, वृक्ष संवर्धक अमोल चौरपगार, कार्यकारी अभियंता श्रीसचिन रक्षमवार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती 
वर्षा घुसे उपस्थित होते.मेयो हॉस्पिटल यांचेकडून सादर करण्यात आलेल्या वृक्ष तोडीच्या प्रस्तावामध्ये समाविष्ट झाडांची मनपा आयुक्तांनी पाहणी केली. रुग्णालय प्रशासनाकडून २ पुरातन आणि १०३ नॉन हेरिटेज झाडे तोडण्याचे प्रस्ताव नागपूर महानगरपालिकेला प्राप्त झाले आहे. पाहणीदरम्यान मनपा आयुक्तांनी उंबर, बकुळ वृक्षांचे पुनर्रोपण (ट्रान्सप्लांट) करण्याचे निर्देश दिले. तसेच अंतर्गत रस्ते आणि क्रीडा मैदानांमध्ये येणाऱ्या पुरातन वृक्षाचे संरक्षण आणि जतन करण्याबद्दलही निर्देशित केले.मेयो हॉस्पिटल येथे नर्सिंग महाविद्यालय, मुलींसाठी वसतिगृह, बहू मजली वाहनतळ, क्रीडा संकुल, अंतर्गत रस्ते आणि मैदानाचा विकास करण्याचे काम राज्य शासनाच्या निधीतून सुरु आहे. आयुक्तांनी वृक्ष तोडीचे नवीन प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश यावेळी दिले.

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 56 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. बुधवार (29) रोजी शोध पथकाने 56 प्रकरणांची नोंद करून 39,300/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवालेछोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 18 प्रकरणांची नोंद करून 7,200/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ताफुटपाथमोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 100 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून 1,200/- रुपयांची वसुली करण्यात आली. 
वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 16 प्रकरणांची नोंद करून 16,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी जनावरे बांधणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 1,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे/ साठवणे या अंतर्गत्त 1 प्रकरणांची नोंद करून 5,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 9 प्रकरणांची नोंद करून 1,800/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 7 प्रकरणांची नोंद करून 7,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे. नीशीगंधा अपार्टमेंट यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्याच्याकडेला टाकल्याबद्दल रू. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. धरमपेठ झोन निखील मानेवार यांनी मनपा विरूध्द विनापरवानगी सी अँड डी कचरा टाकल्याबद्दल रु. 5,000/- रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. तसेच मे.विशेष हॉस्पीटल यांनी मेडीकल वेस्ट कचरा रस्त्यावर टाकल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. 
गांधीबाग झोन अंतर्गत मे. चेतन किराणा शॉप यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. शेखर कपडा कारखाना यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. मंगळवारी झोन अंतर्गत मे. खेमानी इन्फ्रा यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्याच्याकडेला टाकल्याबद्दल रू. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. उपद्रव शोध पथकाने 6 प्रकरणांची नोंद करून रू. 40,000/- दंड वसूल केला.

Tuesday, January 28, 2025

सामान्यांना वेळेत न्याय देणारे विद्यार्थी घडावेत,डॉ.आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या शताब्दी महोत्सव समारंभाचे उद्घाटन

नागपूर:-आपले महाविद्यालय मोठे होत असताना विधी प्रक्रियेमध्ये देखील परिवर्तन आले पाहिजे. त्यात तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर कसा होईल, याचा विचार झाला पाहिजे. यामध्ये वेळ हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सामान्य माणसाचा जो न्याय अपेक्षित होता, त्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. त्यादृष्टीने सामान्यांना वेळेत न्याय देणारे विद्यार्थी या महाविद्यालयातून घडावेत, अशी अपेक्षा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (मंगळवार) येथे व्यक्त केली.डॉ.बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या शताब्दी महोत्सव समारंभाचे उद्घाटन महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी व मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ना. श्री. गडकरी यांनी आठवणींना उजाळा दिला. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, राज्यमंत्री अॅड. आशीष जयस्वाल, राज्यमंत्री इंद्रनील नाईक

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ. राजेंद्र काकडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविशंकर मोर, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य समय बन्सोड व वामन तुरके, कुलसचिव डॉ. राजू हिवसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.ना. श्री.गडकरी म्हणाले, ‘शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण होत असताना गुणवत्ताही राखण्याचे मोठे आव्हान प्रत्येक शिक्षण संस्थेपुढे आहे. विधी
महाविद्यालयाची गुणवत्ता आपल्या न्यायव्यवस्थेशी संबंधित आहे. या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी म्हणून माजी पंतप्रधान नरसिंह राव, माजी उपराष्ट्रपती मो. हिदायतुल्ला, न्यायाधीश मंडळींनी ही गुणवत्ता सिद्ध केली आहे. त्यादृष्टीने काम करणारी पिढी या महाविद्यालयातून तयार होईल याचा मला विश्वास आहे.लोकशाही मूल्यांमध्ये बाबासाहेबांनी जे संविधान दिले आहे, त्यातील मूलभूत तत्त्वे खूप महत्त्वाची आहेत. ही मूल्ये कधीच बदलू शकत नाहीत. संविधानाच्या आधारावरच आपली लोकशाही टिकलेली आहे. जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. वेळेत न्याय मिळाला पाहिजे, असे मला कायम वाटत असते. त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून कसे परिवर्तन करता येईल, याचा विचार करावा, असे आवाहनही ना. श्री. गडकरी यांनी केले.माजी विद्यार्थी म्हणून या सोहळ्यात सहभागी होताना आनंद आणि अभिमानही वाटतोय. अगदी आपल्या घरी आल्यासारखे वाटत आहे. या महाविद्यालयाला शंभर वर्षांचा गौरवशाली इतिहास आहे. मी या महाविद्यालयात होतो तेव्हा महाल आणि बर्डी अशा दोन शाखा होत्या. महाल शाखेतून मी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवडून आलो होतो. इथूनच माझ्या विद्यार्थी जीवनाला सुरुवात झाली. आमच्यावेळी दिनकरराव मेघे प्राचार्य होते. याठिकाणी जे विद्यार्थी शिकले आणि ज्यांनी महाविद्यालयाचे नाव मोठे केले, त्यांचे कर्तृत्व जगापुढे गेले,’ अशी भावना ना. श्री. गडकरी यांनी व्यक्त केली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर नवीन इमारत बांधण्यासाठी सगळी मदत सरकारच्या वतीने करू. तीन वर्षांतच ही इमारत बांधून पूर्ण होईल, यासाठी प्रयत्न करा. निधीची कमतरता पडू देणार नाही. शताब्दी वर्षातच याचे भूमिपूजन करून काम सुरू झाले पाहिजे, अशी अपेक्षा आहे. पण त्याचवेळी जुन्या इमारतीच्या दुरुस्तीची योजना तयार करा. जुनी वास्तू जतन झाली पाहिजे. कारण या वास्तूशी आमच्या भावना जुळल्या आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अंबाझरी, फुटाळा व गोरेवाडा तलावांवर सुरक्षेच्या उपाययोजना नागरिकांनी सुरक्षेच्या सूचनांचे पालन करावे

नागपूर - शहरातील अंबाझरी ,  फुटाळा व गोरेवाडा तलाव ओव्हर फ्लो होण्याची शक्यता लक्षात    घेऊन नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तसेच...