नागपूर:- नागपूर
महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनच्या वतीने ‘पौर्णिमा दिवस' अभियानाद्वारे
बुधवार (ता.१५) प्रताप नगर चौक परिसरात जनजागृती करण्यात
आली. याप्रसंगी ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनचे कौस्तव चॅटर्जी, सुरभी जयस्वाल, मेहुल कोसुरकर, बिष्णुदेव यादव, प्रिया यादव, श्रिया जोगे, पार्थ जुमडे, पिनाकी बनिक आदींनी जनजागृती केली.स्वयंसेवकांनी
व्यापारी
बांधवांना अनावश्यक विद्युत दिवे बंद करण्याचे आवाहन केले. या
अभियानाला प्रताप
नगर चौक परिसरातील
व्यावसायिक, दुकानदार, नागरिकांनी
उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. जनजागृती दरम्यान स्वयंसेवकांनी दुकानदार तसेच
नागरिकांना एक तास विद्युत दिवे बंद ठेवण्याचे आवाहन केले व नागरिकांनी देखील
त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. या अभियानात स्थानिक नागरिकांनी देखील उत्साहाने
सहभाग नोंदवून मनपाला सहकार्य केले.
No comments:
Post a Comment