नागपूर:- वाढत्या
तापमानामुळे संभावणारा धोका टाळण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य
विभागाद्वारे विविध भागांमध्ये जनजागृती कार्य करण्यात येत आहे. उष्माघाताचे
नागपूर शहरात दहा हॉटस्पॉट घोषित करण्यात आलेले आहेत. यातील कळमना मार्केट यार्ड
परिसरात गुरुवारी (ता.१७) जनजागृती करण्यात आली. या जनजागृती नंतर कळमना मार्केट
यार्डमधील व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी उष्माघात प्रतिबंधासाठी पुढाकार
घेण्याचा संकल्प केला.मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या
निर्देशानुसार व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्या मार्गदर्शनात
शहरातील उष्माघात हॉटस्पॉट परिसरांमध्ये जनजागृती केली जात आहे. या अंतर्गत गुरुवारी (ता.१७) कृषी
उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय भवन येथील सभागृहामध्ये सर्व व्यापारी
बांधवांसोबत बैठक घेण्यात आली. बैठकीत मनपाचे साथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे
यांनी व्यापारी बांधवांना माहिती
दिली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अपर
निबंधक तथा सचिव श्री. एन.पी. येगलेवाड, उपसचिव
श्री. आर.एस. चवरे, श्री.
डी.व्ही.बागडे, मनपाच्या लकडगंज झोनचे झोनल
वैद्यकीय अधिकारी डॉ. ख्वाजा मोईनुद्दीन, बाजार
निरीक्षक श्री.एस.एस. निमकर आदी उपस्थित होते.यावेळी व्यापारी बांधवांना उष्माघात म्हणजे काय, त्यावर
प्राथमिक उपचार काय व उष्माघात झालेल्या व्यक्तीचा जीव वाचविण्यासाठी करावयाचे उपाय
तसेच उष्माघात होउ नये यासाठी करावयाच्या उपाययोजना याबाबत सविस्तर
माहिती देण्यात आली. खूप तापमान राहिल्यास त्याचा प्रत्यक्ष व
अप्रत्यक्षपणे आपल्या शरीरावर प्रभाव पडतो.
थेट उन्हात काम केल्यामुळे त्याचे
दुष्परिणाम. अशा स्थितीत काळजी घेणे आवश्यक आहे. घामोळ्या येणे, पायाची नस लागणे (क्रॅम्प येणे), सुस्त वाटणे, चक्कर
येउन पडणे ही साधारणत: उष्णतेमुळे दिसणारे परिणाम आहेत. पण यात सर्वांत उष्माघात हा
अत्यंत धोकादायक आहे. उष्माघात झालेली व्यक्ती अचेत होउन जाते व त्याला स्वत:वर
नियंत्रण करता येत नाही. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होउन जाते घाम देखील येत
नाही. शरीर संपूर्ण कोरडे असताना शरीराचे तापमान प्रचंड वाढते. अशा स्थितीत अशा
व्यक्तीला सावलीत नेऊन वारा घालणे, त्याच्या
डोक्यावर कापड, टॉवेल ठेवून त्यावर पाणी टाकून
शरीराचे तापमान थंड करण्याचा प्रयत्न व १०८ या रुग्णवाहिका सेवा क्रमांकावर फोन
लावून माहिती देणे अशा बाबींची काळजी घेण्याचे आवाहन यावेळी डॉ. नवखरे यांनी केले.व्यापारी
बांधवांनी दुपारच्या वेळी काम बंद ठेवावे. कामाच्या ठिकाणी ग्रीन नेट लावणे, पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था करण्याचे
आवाहन यावेळी मनपाद्वारे करण्यात आले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे अपर निबंधक तथा
सचिव श्री. एन.पी. येगलेवाड यांनीही व्यापारी बांधवांनी मनपाच्या आवाहनाला
प्रतिसाद देण्याची सूचना केली. मार्केट यार्डच्या परिसरात ध्वनीप्रक्षेपकावरुन या
सर्व सूचना देखील देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.शरीराचे तापमान
वाढल्यास त्याला उष्माघात म्हणतात. मळमळ
, उलटी, ताप, त्वचा
कोरडी पडणे, थकवा, चक्कर, डोकेदुखी, मनाची स्थिती बिघडते, चिडचिड, जीभ जड होणे, जास्त
घाम येणे, पायात गोळे येणे, पोटऱ्यात वेदना, रक्तदाब
वाढणे, मानसिक बेचैनी, बेशुद्धावस्था. नागरिकांनी
कामाशिवाय उन्हात निघणे टाळावे.- उन्हात
जाण्याची वेळ आल्यास योग्य खबरदारी घेतली जावी.उन्हाच्या वेळेत बाहेर फिरणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे.- स्वत:सह
इतरांच्याही तब्येतीची काळजी घ्यावी हलकी, पातळ
व सच्छिद्र कपडे वापरावीत बाहेर जाताना गॉगल्स, छत्री
किंवा हॅट, बूट किंवा चप्पलचा वापर करावा, प्रवासादरम्यान
पाण्याची बाटली सोबत ठेवावी, उन्हात
काम करताना हॅट किंवा छत्रीचा वापर करावा. ओल्या
कपड्याने डोके, मान, चेहरा
झाकणे, शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत
असल्यास ओआरएस, लिंबूपाणी, ताक आदी पेय नियमीत पिणे, घर थंड ठेवण्यासाठी
ओलसर पडदे, पंखा, कुलर आदींचा वापर करावा. उष्माघात टाळण्यासाठी उन्हाच्या वेळेत घराबाहेर जाणे, उन्हात कष्टाची कामे करणे टाळा. लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व
पार्क केलेल्या वाहनात ठेवू नका.गडद, घट्ट
व जाड कपडे परिधान करणे टाळावे, उन्हात
स्वयंपाक करणे टाळावे, स्वयंपाक
करताना स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवावीत.मद्य, चहा, कॉफी, सॉफ्टड्रिंक्स ही पेय टाळावी, शिळे आणि उच्च प्रथिने असलेले अन्न खाणे टाळावे.
No comments:
Post a Comment