Friday, July 12, 2024

बूटी कन्या शाळा बेघर निवारा केंद्रात महिला निवाऱ्याची क्षमता वाढणार मनपा आयुक्तांनी केली पाहणी : बेघरांशी साधला संवाद

नागपूर:- नागपूर महानगरपालिका समाज विकास विभागसमाजोपयोगी उपक्रम अंतर्गत सीताबर्डी येथे बूटी कन्या शाळेमध्ये आधार शहरी बेघर निवारा केंद्र संचालित करण्यात येत आहे. या निवारा केंद्रामध्ये जास्तीत जास्त बेघर महिलांना निवारा मिळावा यासाठी महिला निवाऱ्याची क्षमता वाढविण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.शुक्रवारी (ता.१२) मनपा आयुक्तांनी सीताबर्डी मार्केट लगतच्या आधार शहरी बेघर निवारा केंद्राची पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीमती आचंल गोयलउपायुक्त डॉ. रंजना लाडे उपस्थित होत्या. दीनदयाल अंत्योदय योजना व राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत नागपूर मनपा समाज विकास विभागातर्फे बेघर नागरिकांसाठी पाच निवारा केंद्र संचालित करण्यात येत आहेत. यामध्ये आधार शहरी बेघर निवारा केंद्र सीताबर्डीसावली शहरी बेघर निवारा केंद्र भानखेडाहंसापुरीआपुलकी शहरी बेघर निवारा केंद्र समाज भवननवीन 
बिल्डींगइंदोरा मठ मोहल्लाजरीपटकाबोधित्सव शहरी बेघर निवारा केंद्रइंदोरा मठ मोहल्लाजरीपटका व आधार शहरी बेघर निवारा जुने सतरंजीपुरामारवाडी चौक यांचा समावेश आहे.सीताबर्डी येथील बुटी कन्या शाळा येथील निवारा केंद्रात सध्या २५ महिला व २५ पुरुषांची सोय करण्यात आली आहे. तळमजल्यावर पुरुष तथा पहिल्या माळ्यावर महिलांसाठी सोय करण्यात आली आहे. मनपा आयुक्तांनी महिलांच्या निवाऱ्याची क्षमता वाढवून ती ५० पर्यंत करण्याचे निर्देश विभागाला दिले.यावेळी पाहणी करताना आयुक्तांनी बेघर पुरुष आणि महिलांशी संवाद साधला. महिलांनी त्यांना सांगितले कीत्यांचाकडे राहण्याची कोणतीही सोय नाही म्हणून ते इथे राहत आहेत. कोणीही नातेवाईक ठेवायला तयार नसल्यामुळे निवारा केंद्रात आसरा घेतल्याचेही काही महिलांनी सांगितले. बेघर निवारा केंद्राच्या माध्यमातून बेघर व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. त्यांना काही त्रास असल्यास रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात 
येत असल्याची माहिती निवारा केंद्राचे श्री. देवेंद्र क्षीरसागर यांनी दिली.मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी नवलाई शहरस्तर संस्था सोनचिरिया उपजीविका केंद्राची सुध्दा पाहणी केली. पं. रविशंकर शुक्ला हायस्कूलटेम्पल बाजार रोड येथे संस्थेच्या माध्यमातून बचत गटामार्फत तयार करण्यात येणारे पदार्थ व वस्तुंची विक्री केली जात आहे. आयुक्तांनी उपजीविका केंद्र संचालित करणाऱ्या महिलांशी संवाद साधला आणि त्यांच्या कामाचे कौतुक केले.याप्रसंगी शहर व्यवस्थापक प्रमोद खोब्रागडेविनय त्रिकोलवार व नूतन मोरे यांच्यासह अन्य उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment

पंतप्रधान आर्य चाणक्य कौशल्य विकास योजना आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्ट अप योजनेचा करणार आरंभ

नवी दिल्ली:- पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील वर्ध्याला भेट देणार आहेत. सकाळी साडेअकराच्या सुमारास ते पीएम विश्वकर्मा ...