Saturday, June 8, 2024

नदी सफाईचे ९० टक्के कार्य पूर्ण,१५ जूनपर्यंत नद्यांचे स्वच्छता कार्य पूर्ण होणार

नागपूरपावसाळ्यापूर्वी शहरातील नदी आणि नाले सफाईचे काम पूर्ण व्हावे यादृष्टीने कार्याला मिळालेल्या गतीचे परिणाम दिसू लागले आहेतनागपूर शहरातील नागपिवळी आणि पोहरा या तिनही प्रमुख नद्यांची आतापर्यंत एकूण ९० टक्के स्वच्छता झालेली आहे१५ जूनपर्यंत नदी स्वच्छतेच्या कामाचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले असून ते लवकरच पूर्ण होईलअसा विश्वास मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉअभिजीत चौधरी यांनी व्यक्त केला आहे.नागपूर शहरातून वाहणाया नाग नदीपिवळी नदी आणि पोहरा नदी या तिनही नद्यांच्या स्वच्छतेचे कार्य प्रगतीपथावर आहेफेब्रुवारीपासून सुरु झालेल्या नदी आणि नाले स्वच्छता अभियानामध्ये आतापर्यंत शहरातील तिनही नद्यां
च्या सफाई अभियानाने गती पकडली आहेया सफाई अभियानामध्ये नदीच्या सखोल स्वच्छतेवर भर देउन जास्तीत जास्त गाळ काढला जात आहेनाग नदीची लांबी १६.५८ किमीपिवळी नदीची लांबी १७.४२ आणि पोहरा नदीची लांबी १५.१७ किमी आहेयापैकी या तिनही नद्यांचे एकूण ९० टक्के काम झालेले आहेनाग नदीची १३.१९ किमीपिवळी नदीची १६.२२ किमी आणि पोहारा नदीची १२.२६ किमी सफाई पूर्ण झालेली आहेतिनही नद्यांच्या सफाईमधून १५ पोकलेनद्वारे ११२७४५.१७ क्यूबिक मीटर गाळ काढण्यात आलेला आहे१५ जून २०२४ पूर्वी शहरातील तिनही नद्यांची स्वच्छता पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहेपावसाळ्यामध्ये कोणत्याही प्रकारे नदीच्या प्रवाहाला अडथळा होऊ नये  सुरळीतरित्या पाणी वाहून जावे यादृष्टीने निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉअभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.

No comments:

Post a Comment

पंतप्रधान आर्य चाणक्य कौशल्य विकास योजना आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्ट अप योजनेचा करणार आरंभ

नवी दिल्ली:- पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील वर्ध्याला भेट देणार आहेत. सकाळी साडेअकराच्या सुमारास ते पीएम विश्वकर्मा ...